जालना : शहरातील अंबड चौफुली व मंठा बायपास रोड परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. देशभक्तीपर वातावरणात शिवरायांच्या शौर्य, स्वराज्य आणि न्यायनिष्ठेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. (Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2026)
शिवरायांच्या विचारांचा जागर
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी स्वराज्याची स्थापना केली. सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणकारी प्रशासन हे त्यांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. आजच्या पिढीने त्यांच्या आदर्शांवर चालत सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. (Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2026)
कार्यक्रमाला पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये सुंदरलाल बगीनवाल (ओबीसी जिल्हा समन्वयक), सूरज सोनोवने (सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष), राजेंद्र खरात (जिल्हा संघटक), विलास नरवडे, गौतम वाघमारे, राजरत्न आचलखांब, संजय आदमाने, सत्यपाल गायकवाड, विलास भिंगारे यांचा समावेश होता.
तसेच गणेश शिंदे, नितीन बाळराज, बोरखेडीचे सरपंच मनोहर म्हस्के, संकेत दांडगे, सूरज काकडे, कपिल सूर्यनारायण, सुरेश आदमाने यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजात समता, न्याय व बंधुभाव टिकवून ठेवण्याचा संकल्प केला.





