Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शासनाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची भाकर हिसकावली – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 17, 2023
in राजकीय
0
शासनाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची भाकर हिसकावली – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फक्त मदतीची घोषणा करून सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करत शासनाने ऐन दिवाळीत नुकसान भरपाई देण्याच्या नावावर शेतकऱ्यांची भाकर हिसकावली आहे. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य शासनावर निशाना साधला आहे.
दर हेक्टरी नुकसानग्रस्त जमीनीचे क्षेत्र सरकारने वाढवले व मोबदल्यात पाच हजारांची कपात करत शेतकऱ्यांना हवालदिल केलंय. सरकारने बागायती क्षेत्रासाठी १० हजार रुपयांची कपात केली आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटाला आता शेतकरी तोंड देतोय. असेही त्यांनी म्हटले आहे.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. प्रत्यक्षात दिवाळी झाली तरी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. बागायत क्षेत्रासाठी गतवर्षी २७ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली होती. या वर्षी ही मदत केवळ १७ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यात हेक्टर मागे १० हजार रुपये कपात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत सरकारवर निशाना साधला.


       
Tags: Devendra FadanvisEknath ShindeMaharashtramaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

पुणे शहरातील तरुणांचा वंचित मध्ये प्रवेश!

Next Post

आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न – ॲड.प्रकाश आंबेडकर

Next Post
पिडीत आणि अत्याचारी यांच्या संघर्षात मी नेहमी पिडीताच्या पाठीशी  उभा राहीन –  ॲड. प्रकाश आंबेडकर

आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न - ॲड.प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
बातमी

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

by mosami kewat
June 29, 2026
0

मुंबई: एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते,...

Read moreDetails
पुणे जिल्हा हादरला: साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार व हत्याप्रकरणी ६५ वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार व हत्याप्रकरणी ६५ वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

June 29, 2026
भाजपचा 'पेपरफुटी' पॅटर्न

भाजपचा ‘पेपरफुटी’ पॅटर्न

June 29, 2026
दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

June 28, 2026
आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

June 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home