Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 6, 2024
in राजकीय
0
… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?
0
SHARES
306
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

पोटनिवडणुका न घेण्यामुळे आंबेडकरांचा निवडणूक आयोगाला ईशारा !

अमरावती : निवडणुकी आयोगापुढे तीन मार्ग आहेत. एक जबाबदारी पाळता येत नसेल तर, राजीनामा द्या आणि मोकळं व्हा. दोन, संविधानिक जबाबदारी आहे पोट निवडणूक घेणं ती पोटनिवडणूक ताबडतोब घ्या. नाहीतर जनतेला तिसरी गोष्ट करावी लागेल ती म्हणजे, ज्या ठिकाणी निवडणुक आयोग जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन जनतेने निदर्शने केले पाहिजेत, मोर्चे केले पाहिजेत, निषेध केला पाहिजे आणि ते करूनही ऐकत नसतील तर, निवडणूक आयोगाला मारझोड सुद्धा केली पाहिजे. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

निवडणूक आयोगाला, मुंबई हायकोर्टने निवडणुका घ्या म्हणून आदेश दिले आहेत. ते कायद्याला धरून आदेश आहेत. असे असतानाही निवडणूका घेत नाहीत तर, आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करू असे ते सांगत आहेत. निवडणुक आयोग संविधानिक चौकट मोडायला निघाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

निवडणुक आयोगाची स्वायत्तता अबाधित राहावी म्हणून, हुकूमशहाला जे अधिकार मिळतात तेच अधिकार त्यांना दिले आहेत. कारण त्यांना निवडणूक घेण्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. अशी तरतूद असताना निवडणूक आयोग जर पोटनिवडणूक घेणार नसेल तेव्हा लोकांनी कायदा हातात घेतला तर त्याचा अर्थ कायदा मोडला असा होत नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

निवडणुक आयोगाला त्यांनी ईशारा देताना म्हटले आहे की, आपले जे वर्तन आहे ते असंविधानिक आहे, जनतेच्या विरोधात जाणारे आहे आणि संसदीय राजकारणाच्या विरोधात आहे. त्यामुळे जनता उठाव करेल आणि त्याला तुम्हीच जबाबदार असाल.

निवडणुक आयोग स्वायत्त आहे, तो स्वायत्त असे पर्यंत निवडणुका निःपक्षपाती होतील असेही त्यांनी म्हटले.

इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला घाबरत आहेत, निवडणूकीत जित पराजित होत असते. पण, राजकीय पक्षांनी व्यवस्थेशी इमानदार राहील पाहिजे ही किमान अपेक्षा असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

मी वयाच्या २५ व्या वर्षीचं मंत्री झालो असतो –

रामदास आठवलेंच्या प्रतक्रियेवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मला मंत्री व्हायचं असतं तर मी 25 व्या वर्षीच मंत्री झालो असतो. मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात, मुंख्यमंत्री सुद्धा माझ्या मागे पळत असतात. मी पदाच्या पाठीमागे पळत नाही.


       
Tags: ECIElection commissionMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आमदार सुनील कांबळे यांची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; वंचित बहुजन आघाडीने नोंदवला गुन्हा !

Next Post

वंचित युवा आघाडी आणि वंचित माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

Next Post
वंचित युवा आघाडी आणि वंचित  माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

वंचित युवा आघाडी आणि वंचित माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎
बातमी

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎

‎मुंबई: विक्रोळी येथील ६६ कोटी रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी उभारलेला उड्डाणपूल आता वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. यामुळे करत वंचित ...

June 28, 2025
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक
बातमी

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमकजालना : शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर जोपर्यंत नम्रपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना परतुर-मंठा ...

June 28, 2025
मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल
बातमी

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मोठागाव येथे कार आणि रिक्षाच्या धडकेतून झालेल्या वादानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार ...

June 28, 2025
महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप
बातमी

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

‎ ‎मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त ...

June 28, 2025
खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎
बातमी

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

मुंबई : राज्यात अदानी आणि टोरंट या कंपन्यांकडून अनेक शहरांमध्ये वीज वितरणासाठी परवान्यांचे अर्ज करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित ...

June 28, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क