Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 6, 2024
in राजकीय
0
… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?
       

पोटनिवडणुका न घेण्यामुळे आंबेडकरांचा निवडणूक आयोगाला ईशारा !

अमरावती : निवडणुकी आयोगापुढे तीन मार्ग आहेत. एक जबाबदारी पाळता येत नसेल तर, राजीनामा द्या आणि मोकळं व्हा. दोन, संविधानिक जबाबदारी आहे पोट निवडणूक घेणं ती पोटनिवडणूक ताबडतोब घ्या. नाहीतर जनतेला तिसरी गोष्ट करावी लागेल ती म्हणजे, ज्या ठिकाणी निवडणुक आयोग जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन जनतेने निदर्शने केले पाहिजेत, मोर्चे केले पाहिजेत, निषेध केला पाहिजे आणि ते करूनही ऐकत नसतील तर, निवडणूक आयोगाला मारझोड सुद्धा केली पाहिजे. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

निवडणूक आयोगाला, मुंबई हायकोर्टने निवडणुका घ्या म्हणून आदेश दिले आहेत. ते कायद्याला धरून आदेश आहेत. असे असतानाही निवडणूका घेत नाहीत तर, आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करू असे ते सांगत आहेत. निवडणुक आयोग संविधानिक चौकट मोडायला निघाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

निवडणुक आयोगाची स्वायत्तता अबाधित राहावी म्हणून, हुकूमशहाला जे अधिकार मिळतात तेच अधिकार त्यांना दिले आहेत. कारण त्यांना निवडणूक घेण्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. अशी तरतूद असताना निवडणूक आयोग जर पोटनिवडणूक घेणार नसेल तेव्हा लोकांनी कायदा हातात घेतला तर त्याचा अर्थ कायदा मोडला असा होत नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

निवडणुक आयोगाला त्यांनी ईशारा देताना म्हटले आहे की, आपले जे वर्तन आहे ते असंविधानिक आहे, जनतेच्या विरोधात जाणारे आहे आणि संसदीय राजकारणाच्या विरोधात आहे. त्यामुळे जनता उठाव करेल आणि त्याला तुम्हीच जबाबदार असाल.

निवडणुक आयोग स्वायत्त आहे, तो स्वायत्त असे पर्यंत निवडणुका निःपक्षपाती होतील असेही त्यांनी म्हटले.

इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला घाबरत आहेत, निवडणूकीत जित पराजित होत असते. पण, राजकीय पक्षांनी व्यवस्थेशी इमानदार राहील पाहिजे ही किमान अपेक्षा असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

मी वयाच्या २५ व्या वर्षीचं मंत्री झालो असतो –

रामदास आठवलेंच्या प्रतक्रियेवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मला मंत्री व्हायचं असतं तर मी 25 व्या वर्षीच मंत्री झालो असतो. मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात, मुंख्यमंत्री सुद्धा माझ्या मागे पळत असतात. मी पदाच्या पाठीमागे पळत नाही.


       
Tags: ECIElection commissionMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आमदार सुनील कांबळे यांची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; वंचित बहुजन आघाडीने नोंदवला गुन्हा !

Next Post

वंचित युवा आघाडी आणि वंचित माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

Next Post
वंचित युवा आघाडी आणि वंचित  माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

वंचित युवा आघाडी आणि वंचित माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत निषेध बैठक
बातमी

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत निषेध बैठक

by mosami kewat
July 19, 2025
0

‎मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच विधानसभेत पारित केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज मुंबई पत्रकार संघात एका निषेध बैठकीचे आयोजन...

Read moreDetails
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: विरोधकांच्या संमतीनेच मंजूर - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: विरोधकांच्या संमतीनेच मंजूर – देवेंद्र फडणवीस

July 19, 2025
शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश: जिंतूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश: जिंतूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

July 19, 2025
वंचित बहुजन आघाडीचा 'महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका'ला तीव्र विरोध

‎वंचित बहुजन आघाडीचा ‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका’ला तीव्र विरोध

July 19, 2025
मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

July 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home