Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 6, 2024
in राजकीय
0
… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?
0
SHARES
306
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

पोटनिवडणुका न घेण्यामुळे आंबेडकरांचा निवडणूक आयोगाला ईशारा !

अमरावती : निवडणुकी आयोगापुढे तीन मार्ग आहेत. एक जबाबदारी पाळता येत नसेल तर, राजीनामा द्या आणि मोकळं व्हा. दोन, संविधानिक जबाबदारी आहे पोट निवडणूक घेणं ती पोटनिवडणूक ताबडतोब घ्या. नाहीतर जनतेला तिसरी गोष्ट करावी लागेल ती म्हणजे, ज्या ठिकाणी निवडणुक आयोग जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन जनतेने निदर्शने केले पाहिजेत, मोर्चे केले पाहिजेत, निषेध केला पाहिजे आणि ते करूनही ऐकत नसतील तर, निवडणूक आयोगाला मारझोड सुद्धा केली पाहिजे. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

निवडणूक आयोगाला, मुंबई हायकोर्टने निवडणुका घ्या म्हणून आदेश दिले आहेत. ते कायद्याला धरून आदेश आहेत. असे असतानाही निवडणूका घेत नाहीत तर, आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करू असे ते सांगत आहेत. निवडणुक आयोग संविधानिक चौकट मोडायला निघाले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

निवडणुक आयोगाची स्वायत्तता अबाधित राहावी म्हणून, हुकूमशहाला जे अधिकार मिळतात तेच अधिकार त्यांना दिले आहेत. कारण त्यांना निवडणूक घेण्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. अशी तरतूद असताना निवडणूक आयोग जर पोटनिवडणूक घेणार नसेल तेव्हा लोकांनी कायदा हातात घेतला तर त्याचा अर्थ कायदा मोडला असा होत नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

निवडणुक आयोगाला त्यांनी ईशारा देताना म्हटले आहे की, आपले जे वर्तन आहे ते असंविधानिक आहे, जनतेच्या विरोधात जाणारे आहे आणि संसदीय राजकारणाच्या विरोधात आहे. त्यामुळे जनता उठाव करेल आणि त्याला तुम्हीच जबाबदार असाल.

निवडणुक आयोग स्वायत्त आहे, तो स्वायत्त असे पर्यंत निवडणुका निःपक्षपाती होतील असेही त्यांनी म्हटले.

इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला घाबरत आहेत, निवडणूकीत जित पराजित होत असते. पण, राजकीय पक्षांनी व्यवस्थेशी इमानदार राहील पाहिजे ही किमान अपेक्षा असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

मी वयाच्या २५ व्या वर्षीचं मंत्री झालो असतो –

रामदास आठवलेंच्या प्रतक्रियेवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मला मंत्री व्हायचं असतं तर मी 25 व्या वर्षीच मंत्री झालो असतो. मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात, मुंख्यमंत्री सुद्धा माझ्या मागे पळत असतात. मी पदाच्या पाठीमागे पळत नाही.


       
Tags: ECIElection commissionMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आमदार सुनील कांबळे यांची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; वंचित बहुजन आघाडीने नोंदवला गुन्हा !

Next Post

वंचित युवा आघाडी आणि वंचित माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

Next Post
वंचित युवा आघाडी आणि वंचित  माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

वंचित युवा आघाडी आणि वंचित माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क