Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘वंचित’ च्या किमान समान कार्यक्रमात मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 10, 2024
in राजकीय
0
‘वंचित’ च्या किमान समान कार्यक्रमात मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा !
       

महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीने दिला मसुदा !

मुंबई : सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आराक्षणासंदर्भात आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गरीब मराठ्यांचे आरक्षणाचे ताट आणि ओबीसी बांधवांचे आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने किमान समान कार्यक्रमात मांडली आहे. महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश एकत्रित जाहीरनाम्यात व्हावा, अशी अपेक्षा आहे. निवडणूक जवळ येत असल्याने वंचितच्या मसुद्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही मुद्दे समोर येतात का, हे आता पाहावे लागणार आहे.

वंचितच्या मसुद्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आमची स्वच्छ भूमिका असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी यावर सभा आणि पत्रकार परिषदांमधून ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण यांचं ताट वेगळं असावं अशी भूमिका मांडली आहे. राज्यात सर्व नेत्यांना गावबंदी असताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अनेक ठिकाणी सभा आणि परिषदांमध्ये दिसून येत होते. अनेक ठिकाणी मराठा समाजाने त्यांचे मोठ्या थाटात स्वागत देखील केले होते.

मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणसुद्धा वाचलं पाहिजे, अशीही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी ओबीसी परिषदांना त्यांनी हजेरी लावली होती. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांचा समावेश केल्याने गरीब मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावरील विश्र्वास दृढ होताना दिसत असल्याचे चित्र आहे.

अमरावती येथील लोकशाही गौरव सभेतही मी मराठा, मी ओबीसी, मी मुस्लीम, मी धनगर अशा आशयाचे बॅनर झळकले होते. यावरून वंचित बहुजन आघाडी पक्ष आपल्यासाठी आशेचा किरण असल्याची भावना सामान्य जनतेमध्ये निर्माण झाल्याचे दिसत आहे.


       
Tags: mahavikasaghadiNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यातील धनगर बांधव ॲड. आंबेडकरांच्या भेटीला !

Next Post

पुण्यात होणार ‘वंचित’ ची सत्ता परिवर्तन महासभा !

Next Post
काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर…

पुण्यात होणार 'वंचित' ची सत्ता परिवर्तन महासभा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home