Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वंचितने सुचवला ठोस उपाय.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 10, 2024
in राजकीय
0
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी  वंचितने सुचवला ठोस उपाय.
0
SHARES
180
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

किमान समान कार्यक्रमात मांडला शेतकरी विकास आराखडा !

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या हा कर्जबाजारीपणाचा थेट परिणाम आहे. कर्जबाजारीपणा हा अनेक घटकांचा परिणाम आहे. त्यामुळे बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी, वीज आणि डिझेल यांसारख्या कृषी निविष्ठांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ नियंत्रणात आली पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने किमान समान कार्यक्रमात मांडली आहे.
महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश एकत्रित जाहीरनाम्यात व्हावा, अशी अपेक्षा आहे.

कृषी संकट आणि कर्जातून मुक्तीसाठी…


विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष सत्वर पूर्ण करणे आवश्यक आहे. कृषी संकटांचे कारण म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अवलंबत असलेली नव-उदारवादी आर्थिक धोरणे हे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहे. कृषी क्षेत्रातील या नव-उदारवादी धोरणातील बदलांचे काही ठळक पैलू आम्ही मांडले आहेत. ज्यात बदल आवश्यक आहेत कारण या धोरणांमुळेच कृषी संकट आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणात भर पडली आहे, असे वंचितने महाविकास आघाडीला दिलेल्या मसुद्यात म्हटले आहे. कॉर्पोरेट्सना जमिनीचा मोठा भूभाग देण्यासाठी जमीन सुधारणांचे उलटसुलटीकरण रद्द करणे, खते आणि डिझेल यांसारख्या सर्व कृषी निविष्ठांवरील सबसिडी कमी न करणे, विदेशी कृषी आयातीवरील परिमाणात्मक निर्बंध हटवणे, कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकासावरील सार्वजनिक खर्चात वाढ करणे, कृषी क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण, ज्यामुळे सर्व निविष्ठांच्या खर्चात मोठी वाढ होते. त्यावर सकारात्मक नियंत्रण ठेवणे, सिंचन आणि उर्जा प्रकल्पांचे 100% खाजगीकरण रद्द करणे, निर्यात-केंद्रित शेतीला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करणे आदी मुद्यांची चर्चा यात करण्यात आली आहे.

शेतक-यांच्या विकासासाठी सुचविला कार्यक्रम

  • एकाधिकार कापूस खरेदी योजना पुन्हा कार्यान्वित करावी.
  • शेतकऱ्यांसाठी बँक आणि इतर संस्थात्मक कर्जाची कमतरता आहे त्यासाठी दीर्घकालीन व अल्प व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून द्यावे
  • दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पीक अपयशी ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पीक विम्याच्या प्रभावी छत्राची उपलब्धता करून द्यावी.

       
Tags: CongressMaharashtramahavikasaghadiNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुण्यात होणार ‘वंचित’ ची सत्ता परिवर्तन महासभा !

Next Post

असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

Next Post
असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे - मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र युद्धानंतर भारताच्या बाजून एकही देश का उभा राहिला नाही याबाबत लोकांनी मोदी,भाजप आणि ...

June 6, 2025
आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला
बातमी

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

'लाडकी बहीण'साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका, 410 कोटींचा निधी वळवला मुंबई - सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गत विधानसभा ...

June 6, 2025
फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना
बातमी

फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

मुंबई- राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...

June 6, 2025
शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल
Uncategorized

शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

रायगड - रायगडावर आज छत्रपती शिवाजी महारांचा 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा गेला जात आहे. यासाठी लोखो शिवभक्तांची अलोट गर्दी किल्ले ...

June 6, 2025
देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर
Uncategorized

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

पुणे - देशात जातीय जनगणना सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होणार ...

June 6, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क