Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

“द्वि अक्षी” सार्वजनिक चर्चा विश्व : एक सापळा!

mosami kewat by mosami kewat
December 17, 2025
in अर्थ विषयक
0
“द्वि अक्षी” सार्वजनिक चर्चा विश्व : एक सापळा!

“द्वि अक्षी” सार्वजनिक चर्चा विश्व : एक सापळा!

       

संजीव चांदोरकर

गेली काही दशके अर्थव्यवस्था विषयक ज्या चर्चा होतात त्यांचा मागोवा घ्या. आपल्याला हे जाणवेल की अशा चर्चा खालील अक्षांभोवती “फिरत्या” ठेवल्या जातात.

मुक्त बाजाराधिष्टित अर्थव्यवस्था विरुद्ध शासन नियंत्रित अर्थव्यवस्था
खाजगी क्षेत्र विरुद्ध सार्वजनिक क्षेत्र
शेती क्षेत्र विरुद्ध औद्योगिक क्षेत्र
शहरे विरुद्ध ग्रामीण भाग
नफा कमावणे म्हणजे कार्यक्षमता विरुद्ध तोटा होणे म्हणजे अंकार्यक्षमता
श्रीमंत विरुद्ध गरीब
भांडवलशाही विरुद्ध समाजवाद विरुद्ध कामन्यूनीझम
सहृदयी मालक / भांडवलदार विरुद्ध निर्दयी मालक/ भांडवलदार
भांडवलदार विरुद्ध कामगार
शिस्त पाळणारा कामगार/ कर्मचारी विरुद्ध आळशी कामगार / कर्मचारी
भ्रष्टाचारी राजकारणी विरुद्ध शुद्ध चारित्र्याचा राजकारणी
पर्यावरण विरुद्ध आर्थिक विकास

चर्चांचे असे दळण दळत ठेवले की दोन्ही बाजू एकमेकात शिंगे अडकवून बसतात. प्रश्न तेथेच राहतात. शब्दांचा किस पडत राहतो. हस्तक्षेपाच्या ठोस जागा समोर येऊच शकत नाहीत.

आर्थिक चर्चा अशा द्वि अक्षांभोवती फिरत ठेवणे त्यांनी रचलेला सापळा असू शकतो. त्यांना ते सोयीचे आहे. कारण खरे इश्यू पुढे येत नाहीत. उदा. कॉर्पोरेट, वित्त भांडवलाची हैजमोनी, प्रभुत्वसत्ता, हिंसक दादागिरी याबद्दल ते कधीही बोलत नाहीत. खरा गेम तर तो असतो. त्यांची वैचारिक मांडणी दाखवण्यासाठी असते. आपण त्या वैचारिक मांडणीला फेस व्हॅल्यू वर घेतो.

सत्य हे आहे की

कायदे / नियामक मंडळांचे नियम असे बनवले जतात की जे कॉर्पोरेट / वित्त भांडवलाच्या हिताचे रक्षण आणि संवर्धन करतील. अनेक कायद्यात अशा तरतुदी असतात की मंत्री / नोकरशहा / नियामक मंडळाचे प्रमुख यांना शेवटचा निर्णय देण्याचा / फिरवण्याचा अधिकार / डिस्क्रिशनरी पॉवर दिलेला असतो

अनेक गैरसोयीच्या विषयांवर शासन गप्प राहते.

कामगार , कष्टकरी, शेतकरी ,या आदिवासी यांचे मूलभूत अधिकार गदा आणणारे कायदे केले जातात.

लोकशाहीत मते मिळवण्यासाठी अनेकानेक टोकन कल्याणकारी योजना आखल्या जातात. भांडवल बाजारातील अनुत्पादक सट्टेबाजीला लगाम घातला जात नाही.

वित्त भांडवलाला कोट्यवधी गरिबांना / स्त्रियांना / विद्यार्थ्यांना लाखो कोटी रुपयांची कर्जे वाटण्यास आणि त्याची निष्ठुर वसुली करण्याचा अधिकार दिला जातो.

आणि अगदी हाताबाहेर गेले की क्रूर दंडसत्ता वापरली जाते

ही यादी परिपूर्ण नाही.

हे विषय पुढे आणले पाहिजेत. वरील प्रचलित प्रत्येक गोष्टीला आव्हान देण्यास भरपूर वाव आहे. त्यासाठी त्यांचा सापळा ओळखला पाहिजे. चर्चा आपल्या अंगणात झाल्या पाहिजेत. त्यांच्या अंगणात नव्हे.


       
Tags: BeyondTheBinariesCorporateHegemonyCronyCapitalismDemocraticAccountabilityEconomicEconomicAwarenessEconomicDiscourseFinanceCapitalRegulatoryCaptureSocialJusticeEconomicsStayInformedStructuralInequalitySystemicCritique
Previous Post

वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; ‘स्वाधार’ योजनेला मुदतवाढ!

Next Post

शेतकऱ्याचा ‘किडनी’ विक्रीचा टाहो; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार, ‘मतदानाचा पॅटर्न बदलण्याचे’ शेतकऱ्यांना आवाहन

Next Post
शेतकऱ्याचा ‘किडनी’ विक्रीचा टाहो; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार, ‘मतदानाचा पॅटर्न बदलण्याचे’ शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्याचा 'किडनी' विक्रीचा टाहो; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार, 'मतदानाचा पॅटर्न बदलण्याचे' शेतकऱ्यांना आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार
बातमी

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

by mosami kewat
July 30, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ आज, गुरुवार (३० जुलै) रोजी लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली....

Read moreDetails
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

July 30, 2026
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home