Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

…तर काँग्रेसने रिंगणातून बाहेर पडावे!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 13, 2024
in राजकीय
0
…तर काँग्रेसने रिंगणातून बाहेर पडावे!
0
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : उमरेड नागपूरमध्ये प्रचार दौरा

नागपूर : शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. मी अनेक नावं घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले. आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल, की भाजप हरली पाहिजे, तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा. भाजपसोबत दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही मोदीची ताकद उखडून टाकायला निघालो आहोत. आम्ही त्यांना उघडे पाडत आहोत. जे तुम्ही करायला पाहिजे ते आम्ही करत आहोत, म्हणून शाम मानव आणि तुषार गांधी यांना मिरच्या झोंबायला लागल्या आहेत. आपली चळवळ भक्कम राहिली पाहिजे. काँग्रेसवाले कितीही म्हणाले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. रामटेक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

आंबेडकर यांनी मोदी आणि भाजपवरही जोरदार टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदींची दमदाटी करून वसुली करण्याची पद्धत ही गल्लीतल्या दादापेक्षा वेगळी आहे का ? गावात जो वसुली करतो त्यालाही आपण गुंड म्हणतो, काँग्रेसवाल्यांना संधी आली होती, हे उघड करण्याची पण ते भूमिका घ्यायला तयार नाहीत. ते म्हणत आहेत की, आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि म्हणून आम्हाला मतदान द्या. यांचा नुसता बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे. शेवटी आपल्यालाच लढावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंग हा शब्द मोदी आणि निवडणूक आयोगासंदर्भात वापरला होता. पण महाविकास आघाडीने तो प्रत्यक्षात महाराष्ट्रात उतरवला आहे. याचे उदाहरण देतो की, कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) यांनी जो उमेदवार दिला, त्या उमेदवाराला कल्याणची माणसं म्हणत आहेत की, हा उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढू शकत नाही. काँग्रेसचे नाना पटोले यांचे नाव भंडारा गोंदियामधून जाहीर झाले. काँग्रेसने नांदेडमध्ये चव्हाण नावाचा उमेदवार उभा केला जो आठवड्यातून तीन दिवस डायलेसिसवर असतो, तो तब्येत सांभाळणार की, प्रचार सांभाळणार ? मी अनेक उदाहरणे देऊ शकतो, यांच्या मनात चौकशीची भीती आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मॅच फिक्सिंग झाली आहे.

रामटेक मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार घ्या, सर्वांना माहिती होते की, त्याचे जात प्रमाणपत्र टिकणार नाही. तरीही त्याला जबरदस्तीने उमेदवारी दिली आणि उमेदवारी रद्द झाली. त्यानंतर त्यांच्या पतीला उमेदवारी दिली. काँग्रेसचे अनेक नेते चौकशीखाली आहेत, दोन दिवसांपूर्वी बातमी आली की, हेरॉल्ड या पेपरला नोटीस आली आणि 875 कोटींची संपत्ती जोडली गेलीय त्यामध्ये खरगे हे आरोपी आहेत. त्यामुळे लढण्याची इच्छाच यांच्यामध्ये दिसत नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मला विचारतात की, आमच्या नेत्यांना झालंय काय? मी त्यांना म्हणालो की, तिहार जेलचा रोग लागलेला आहे. आपण चिंता करू नका, आपण मिळून लढू, भाजपची सत्ता आपण घालवू असा जिल्ह्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता मला निरोप देतोय असा खुलासा करत आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपला हरवायचे ठरवले आहे, मात्र नेत्यांनी त्यांना वाचवायचे ठरवले आहे.

विशाल पाटील लढले, तर त्यांना पाठिंबा देवू

चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील आले आणि म्हणाले की, काय करायचं ? म्हटलं हिंमत असेल, तर लढा. विशाल पाटील लढले तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू अशी ग्वाही या वेळी ॲड. आंबेडकर यांनी दिली. तसेच सांगलीत काँग्रेसची ताकद आहे. सेना तिथे शून्य आहे. पण या काँग्रेसची एवढी ताकद नाही की, त्या शिवसेनेला (ठाकरे गट) सांगायचं की, मैत्रीपूर्ण होऊ द्या आम्ही तिथे आमचा उमेदवार उभा करतो, असेही आंबेडकर म्हणाले.


       
Tags: LoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarramtekVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितला बी टीम म्हणणाऱ्या गांधींना ‘वंचित’ ने सुनावले

Next Post

काँग्रेसचे नकली खोटे मुस्लीम प्रेम

Next Post
काँग्रेसचे नकली खोटे मुस्लीम प्रेम

काँग्रेसचे नकली खोटे मुस्लीम प्रेम

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क