Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आधी कायद्याचा मसुदा जाहीर करा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 9, 2023
in बातमी, राजकीय
0
जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर
       

समान नागरी कायद्या वरून एड. प्रकाश आंबेडकरांचे भाजप आणि आरएसएस ला आव्हान!

नवीन संसद भवनाच्या उद्घाटना पूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता कायद्यावर चर्चा घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. विधी आयोगाने ही त्यावर सूचना मागितल्या आहेत. मात्र ज्या कायद्याबाबत चर्चा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या कायद्याचा मसुदा च तयार नाही. आधी तो जाहीर करा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस ला) केलेले आहे.

अकोला येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधी आयोगाने समान नागरी कायद्यावर चर्चा करण्यासंदर्भात केलेल्या आव्हाना बाबत त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कायद्याचा मसुदाच तयार नाही. तर चर्चा कशावर करावी प्रतिक्रिया कशावर द्याव्यात? असा प्रति प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कायद्याबाबत घाई घाईत निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे सध्या भाजपाकडे निवडणूक साठी कोणताही मुद्दा उरला नाही. त्यामुळे समान नागरी कायद्यावर चर्चा सुरू करण्यात आली आहे.

हिंदू समाजात भांडणे लावण्याचा प्रकार सध्या हिंदूचे ठेकेदार म्हणविणाऱ्या आरएसएस कडून सुरू असल्याचा आरोपही एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला. ज्या कायद्यावर केंद्र सरकार चर्चा घडवून आणू पहाते आहे. त्या कायद्याचा मसुदा आधी प्रसिद्ध करावा! असे आव्हान त्यांनी दिले.

समान नागरी कायद्या वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान हे सध्या बावरची/ आचारी च्या भूमिकेत वागत असल्याचे सांगितले. मात्र त्यांना घरात काय काय आहे? गॅस आहे? किंवा नाही? धान्य आहे? किंवा नाही?याचीच माहिती नाही, आणि ते स्वयंपाक करायला निघाले आहेत. त्यांचे घरच खाली असल्याचे सांगून एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिला संदर्भ!

अकोल्याच्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की,
संविधानावरील चर्चेत समान नागरी कायद्याबाबत बाबासाहेबांनी जबाबदारी घेतली होती. तेव्हा हिंदूंच्या विवाह पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. हिंदू समाजातील विवाह पद्धती हा गुंतागुंतीचा विषय परंतु हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. विविध राजकीय पक्षात व संघटना मध्ये याबाबत त्यावेळी एकमत झालेले नव्हते. समान नागरी कायदा करायचा म्हणजे सध्या प्रचलित असलेल्या हिंदू विवाह पद्धती पैकी एक पद्धती स्वीकारावी लागेल. हिंदुंमध्ये विवाहाच्या दोन पद्धती आहेत. विवाह हा प्रत्येक समाजाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हिंदू समाजाचाही विवाह हा विषय जिव्हाळ्याचा विषय आहे. हिंदू विवाहाच्या दोन पद्धती आहेत.
१) ब्राह्मण आणि क्षत्रिया चे होम आणि सात फेरे/सप्तपदी घेऊन होणारा विवाह.
२) हिंदू समाजातील शूद्र आणि अतिशूद्र, इतरांचा अंतरपाट धरून होणारा विवाह.
या दोन विवाह पद्धतीपैकी कोणती एक विवाह पद्धती स्वीकार करणार आहे? ते आधी भाजप व आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान एडवोकेट प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय नेते वंचित बहुजन आघाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिलेले आहे.

(अकोला पत्रकार परिषदेतील दिनांक ८ जुलै 2023, संकलन प्राचार्य म.ना.कांबळे)


       
Tags: bjpnarendra modiPrakash AmbedkarrssUniform Civil Codevba
Previous Post

समतादुतांच्या कार्यशाळेत बार्टी महासंचालक व अधिकारी कर्मचारी ह्यांचा बेभान डान्स.
ह्या सर्व नाच्या ना निलंबित करा – राजेंद्र पातोडे.

Next Post

ज. वि. पवार यांच्या ग्रंथाचे प्रकाशन व वाढदिवस राजगृहात साजरा

Next Post
ज. वि. पवार यांच्या ग्रंथाचे प्रकाशन व वाढदिवस राजगृहात साजरा

ज. वि. पवार यांच्या ग्रंथाचे प्रकाशन व वाढदिवस राजगृहात साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कारंजामध्ये रेशन धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
बातमी

कारंजामध्ये रेशन धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by mosami kewat
July 21, 2025
0

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कोळी तुळजापूर शिवारातील...

Read moreDetails
जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

July 21, 2025
मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

July 21, 2025
पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

July 21, 2025
मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम; अंधेरी सबवे बंद

मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम; अंधेरी सबवे बंद

July 21, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home