पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरातील ४३ एकर महार वतनाची १८०० कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे केवळ ३०० कोटी रुपयांना विकण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.
या पीडित दलित शेतकऱ्यांनी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली. या प्रकरणी पीडित दलित शेतकऱ्यांनी आमची फसवणूक करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
ही जमीन पूर्वी सरकारने भाडेपट्ट्यावर दिली होती. तथापि, योग्य सरकारी मान्यता न घेता आणि सरकारी संगनमताने, हा करार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ९९% हिस्सा असलेल्या कंपनीला करण्यात आला. शिवाय, या करारावर २१ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले.

अॅड. आंबेडकर म्हणाले, “हे भ्रष्टाचार आणि अन्यायाचे उदाहरण आहे. ‘मी खाणार नाही आणि दुसऱ्यांना खाऊ देणार नाही’ असे म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करावे – हे तुमचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे का? ‘सबका साथ, सबका विकास’चे हे वास्तव आहे का?”
वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहे की, ते पीडित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढतील.
जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फसणार – राजेंद्र पातोडे यांचा इशारा
कालच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात निदर्शने केली. पीडित शेतकऱ्यांना घेऊन पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.






