Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा

mosami kewat by mosami kewat
August 8, 2025
in बातमी
0
Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा

Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा

       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना आवाहन

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन केले. मुख्यतः कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात सहभागी होऊन आपले मत मांडावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर म्हणाले की, आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेल्या 76 लाख मतांबाबत इलेक्शन कमिशनकडे कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही. आयोग स्वतःच माहिती नसल्याचे सांगत असेल, तर ही निवडणूक प्रक्रियाच संशयास्पद ठरते. ‘फ्री अँड फेअर इलेक्शन’ हा संविधानाचा मूलभूत अधिकार असून, तो पाळला गेला नसेल तर निवडणुका रद्द करण्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.

नोव्हेंबर 2025 मध्येच सर्व पक्षांना एकत्र न्यायालयीन लढाई लढण्याचे आवाहन पत्राद्वारे केले होते, असे आंबेडकरांनी सांगितले. मुंबई हायकोर्टाने आमची याचिका फेटाळल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असून, इतर पक्ष ‘पक्षकार’ म्हणून आले तर हा मुद्दा अधिक मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींनी कर्नाटकमधील एका मतदारसंघातील बोगस मतदारांचा खुलासा केल्याचे त्यांनी स्वागत केले. मात्र, हा मुद्दा फक्त पत्रकार परिषदेत न मांडता सुप्रीम कोर्टातही मांडणे आवश्यक आहे. काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे, त्यांनी या प्रकरणात हजर राहून युक्तिवाद करावा, असे त्यांनी सुचवले.

आंबेडकरांनी हेही नमूद केले की, इलेक्शन कमिशनने राहुल गांधी यांच्या प्रश्नांना प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

सुब्रमण्यम स्वामी यांच्या खटल्याचा दाखला देत आंबेडकर म्हणाले की, व्हीव्हीपॅटद्वारे मतांची पडताळणी बंधनकारक आहे. जर ती होत नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सर्व पक्षांनी एकत्रितपणे करावी. ही लढाई कोर्टाची आहे. जनजागृती महत्त्वाची असली तरी निर्णय फक्त न्यायालय घेऊ शकते, असे आंबेडकरांनी ठामपणे सांगितले.


       
Tags: AssemblyElectionsMaharashtraPrakash AmbedkarRahul Gandhisupreme courtvote
Previous Post

राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महामंडळ कार्यालयास निवेदन

Next Post

पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

Next Post
पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन
बातमी

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन

by mosami kewat
March 21, 2026
0

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची...

Read moreDetails
२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

२३ मार्चच्या ‘आरएसएस’ मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

March 21, 2026
गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

March 21, 2026
महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

March 21, 2026
‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा – ॲड. प्रकाश आंबेडकर 

‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा – ॲड. प्रकाश आंबेडकर 

March 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home