Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Prakash Ambedkar : “शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला हवे, त्याची स्मशानभूमी करू नये”

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
Prakash Ambedkar : “शिवाजी पार्क हे  शिवाजी पार्कच राहायला हवे, त्याची स्मशानभूमी करू नये”
       

मुंबई : लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाची मागणी करण्यात आली आहे. शिवजीपार्कवर स्मारक करावे का असा प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे मत मांडले.

“माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहिलं पाहिजे. त्याला स्मशानभूमी करू नये. बाजूला एक स्मशानभूमी चांगली आहे, मोठी आहे.” असे बाळासाहेब आंबेडकर यावेळी म्हणाले.

“ते खेळाचं मैदान आहे. अनेक खेळाडू त्या मैदानावर घडलेले आहेत. अनेक शाळांचे, क्लबचे मॅचेस तिथे होतात. व्यक्तींचं स्मारक करायचं असेल तर अनेक ठिकाणी बऱ्याच जागा आहेत. त्यासाठी खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करावं असं मला वाटत नाही.” असेही ते म्हणाले.

“माणसांची तत्व असतात, त्यांचा सन्मान करावा.”

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ट्रोलिंग करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. ते चुकीचे आहे असे ते म्हणाले.

लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांवर गाणं म्हणायला नकार दिल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “नेहरूंवरही गायले नाही, सरदार पटेलांवरही गायले नाही. काही माणसांचे तत्व असतात, त्याला honour केलं पाहिजे”

“ट्रोलिंग करणे चुकीचे आहे. जे बोलायचं ते जिवंतपणी बोलायला हवं होतं. एकदा माणूस गेला की त्याचा आदरच झाला पाहिजे असं मला वाटतं.” असेही ते म्हणाले.


       
Tags: Lata MangeshkarPrakash AmbedkarShivaji Park
Previous Post

मी नथुराम कोल्हे बोलतोय…..

Next Post

बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

Next Post
बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करा! – ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी
बातमी

NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करा! – ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

by mosami kewat
July 24, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी NEET परीक्षा रद्द करण्याची आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याची...

Read moreDetails
पानगावमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद

पानगावमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद

July 24, 2026
धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

July 24, 2026
NEET पलीकडचा संघर्ष : शिक्षण, आरोग्य आणि व्यवस्थात्मक बदलाची अपरिहार्यता

NEET पलीकडचा संघर्ष : शिक्षण, आरोग्य आणि व्यवस्थात्मक बदलाची अपरिहार्यता

July 24, 2026
नीट परीक्षा आंदोलकांवरील कारवाईचा निषेध: वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवेढा बंद

नीट परीक्षा आंदोलकांवरील कारवाईचा निषेध: वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवेढा बंद

July 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home