Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
August 11, 2025
in बातमी
0
‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

       

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे विरोधी पक्षांना आवाहन: ‘ ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधातील याचिकेत सहभागी व्हा’
‎
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, केवळ मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, तर कोर्टातूनच आपल्याला न्याय मिळू शकतो. जर विरोधी पक्षांचा लढा खरा असेल तर त्यांनी या याचिकेत एक पक्ष म्हणून सहभागी व्हावे.
‎
‎अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, आम्ही जेव्हा विरोधी पक्षांना उच्च न्यायालयात जाऊ आणि निवडणूक आयोगाला विचारू की जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील, तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष कशी झाली? हे आम्हाला सांगा आणि ७६ लाख मतदान हे मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदारांनीच केले आहे का? हे विचारू, असे पत्र लिहिले होते. पण, त्यावेळी कोणीही आमच्या बाजूने उभे राहिले नाही.
‎
‎मुंबई उच्च न्यायालयाने ७६ लाख मतदानाच्या वाढीची याचिका फेटाळली असली तरी, आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या याचिकेमध्ये तरी विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
‎
‎पुढे त्यांनी म्हटले की, कोर्टाच्या माध्यमातूनच आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू शकतो की, ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष कशी झाली? ते आम्हाला सांगा. या मुद्द्यावर लढा देण्यासाठी कोर्टातील सहभाग आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.


       
Tags: Election commissionmumbaiPrakash Ambedkarvote
Previous Post

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर
बातमी

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 11, 2025
0

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे विरोधी पक्षांना आवाहन: ' ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधातील याचिकेत सहभागी व्हा'‎मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड....

Read moreDetails
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

August 11, 2025
'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

August 11, 2025
‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

August 11, 2025
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; अकोला येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी ‎

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; अकोला येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी ‎

August 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home