Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

mosami kewat by mosami kewat
August 11, 2025
in बातमी
0
‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

       

‎
अकोला – वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना राखी बांधून महिला आघाडीने त्यांना या सणाचे महत्त्व आणि पोलिसांची जबाबदारी याची आठवण करून दिली.
‎
‎वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आम्रपालीताई खंडारे आणि जिल्हा महासचिव संगीताताई अढावू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना राखी बांधली. यावेळी उप-जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी (महिला आणि पुरुष) यांनाही राख्या बांधण्यात आल्या.
‎
‎यावेळी महिला आघाडीच्या सदस्यांनी सांगितले की, आम्ही महिला स्वतःला ‘अबला’ मानत नाही. त्यामुळे बहिणींचे रक्षण भावांनी करावे, या विचारापेक्षाही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन करावे, ही आमची अपेक्षा आहे. समाजात काही वेळा रक्षकच भक्षक बनतात, असा अनुभव आपल्याला येतो. पुण्यात पोलिसांकडून नागरिकांवर झालेल्या दादागिरीच्या घटनेचा संदर्भ देत, महिलांनी पोलिसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
‎
‎यावेळी महिला आघाडीने एक पत्र वाचून दाखवले, ज्यात स्त्री-पुरुष समानतेचा आणि मानवी हक्कांच्या रक्षणाचा संदेश होता. महिलांचा सन्मान आणि समानता समजत नसेल, तर किमान रक्षाबंधनाचे महत्त्व लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
‎
‎यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपस्थित महिलांना बक्षिसे दिली, तेव्हा “रक्षकच भक्षक बनू नये” हीच खरी ओवाळणी असल्याचे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले. हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
‎
‎या कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जिल्हा संघटक अनुराधाताई ठाकरे, महानगर अध्यक्षा वंदनाताई वासनिक, माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती मायाताई नाईक, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षीताई शेळके, जिल्हा सदस्य दुर्गाताई अवचार, ग्रा.पं. देवळीच्या माजी सरपंच वैशालीताई सदांशिव, अकोला तालुकाध्यक्षा मंगलाताई शिरसाट, विद्याताई धाडसे, तेजस्विनी बागडे, सरोजताई वाकोडे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
‎
‎


       
Tags: AkolaAnjali AmbedkarpoliceRakhivbaforindia
Previous Post

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

Next Post

मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!

Next Post
मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!

मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home