Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 8, 2022
in बातमी
0
५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू.
0
SHARES
213
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

Election, Election commission, Goa, manipur, Punjab, uttarpradesh, Uttrakhand

उत्तर प्रदेश, पंजाब, गोआ, मणीपूर आणी उत्तराखंड येथे निवडणुका.

दिल्ली : निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ५ राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. ७ टप्प्यांमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेल अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली. यापैकी उत्तर प्रदेशची निवडणूक ७, मणीपूरची २ आणी पंजाब, गोआ व उत्तराखंड ची निवडणूक १ टप्प्यात पार पडेल.

निवडणुकीच्या तारखा पुढील प्रमाणे :

  • पहिला टप्पा – १०.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश येथे.
  • दुसरा टप्पा – १४.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश, पंजाब, गोआ, व उत्तराखंड येथे.
  • तिसरा टप्पा – २०.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश येथे.
  • चौथा टप्पा – २३.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश येथे.
  • पाचवा टप्पा – २७.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश व मणीपूर येथे.
  • सहावा टप्पा – ०३.०३.२२ रोजी उत्तरप्रदेश व मणीपूर येथे.
  • सातवा टप्पा – ०७.०३.२२ रोजी उत्तरप्रदेश येथे.

मतमोजणी १०.०३.२०२२ रोजी करण्यात येईल.

१५ जानेवारी पर्यंत प्रचार सभांना बंदी

कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १५ जानेवारीपर्यंत प्रचार सभांना बंदी घालण्यात आली आहे. १५ जानेवरीला बंदी वाढवायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. संपूर्ण प्रचारादरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर, चौकांमध्ये प्रचार सभा, नुक्कड सभा घेता येणार नाही असेही सांगण्यात आले. विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्याची परवानगी मिळणार नाही. निवडून आल्याचे प्रमाणपत्र घ्यायला जातानाही केवळ २ लोकांना सोबत घेऊन जाता येईल.

गुन्हेगारी पर्शवभूमी असल्यास लोकांसमोर जाहीर करणे बंधनकारक.

उमेदवारांची गुन्हेगारी पर्शवभूमी असल्यास ती लोकांसमोर जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे बंधन उमेदवार व राजकीय पक्ष दोघांवरही असणार आहे. प्रचाराच्या कालावधीत किमान ३ वेळा गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती TV व वर्तमानपत्रातून जाहीर करणे उमेदवारावर बंधनकारक असणार आहे. तसेच, राजकीय पक्षांनी त्यांच्या संकेतस्थळांवर(website) मुख्य पेज(home page) वर ही माहिती देणे बंधनकारक असणार आहे. एवढेच नव्हे तर गुन्हेगारी पर्शवभूमी असतानाही त्यांना उमेदवारी का दिली याचं करण, स्पष्टीकरण देणेही राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कारण देताना “निवडून येण्याची क्षमता”(winnability) हे कारण देता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवार, नेत्यांचे समर्थन करताना हे कारण सर्रास वापरले जाते.

एकूण १८.३४ कोटी नोंदणीकृत मतदार.

५ राज्ये मिळून १८.३४ कोटी नोंदणीकृत मतदार असल्याचे सांगण्यात आले. यापैकी ८ कोटी ५५ लाख महिला मतदार असणार आहेत. एकूण ६९० विधानसभा मतदारसंघात २,१५,३६८ मतदान केंद्रांची व्यवस्था असेल. यापैकी १६२० मतदान केंद्र पूर्णपणे महिला संचालित असतील.

पोस्टल वोट ची सुविधा

८० वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, कोविडग्रस्त नागरिक व benchmark disability, अर्थात अपंगत्व असलेल्या नागरिकांना घरून मतदान करता येणार आहे. दोन अधिकारी थेट घरी येऊन मतदान करवून घेतली. अशा नागरिकांची माहिती राजकीय पक्षांना सुद्धा देण्यात येईल, जेणेकरून त्यांचे प्रतिनिधी मतदानावेळी उपस्थित राहू शकतील.

उमेदवारी अर्ज ऑनलाइन

उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याची सोय करण्यात येणार आहे. कोविडचा नव्याने वाढणारा प्रादुर्भाव पाहता, अधिकाधिक उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑनलाइन भरावा अशी अपेक्षा निवडणूक आयोगाकडून व्यक्त करण्यात आली.

निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाखांपर्यंत वाढवली

उत्तरप्रदेश, पंजाब व उत्तराखंड येथील उमेदवारांना ४० लाखांपर्यंत निवडणुकीक खर्च करता येणार आहे. गोआ व मणीपूर येथील उमेदवारांसाठी ही मर्यादा २८ लाख असेल.

IAS, IPS व IRS मधून अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रियेवर ते लक्ष ठेऊन असतील. १ लाख मतदान केंद्रांवर webcasting द्वारे लक्ष ठेवण्यात येईल.

सामान्य नागरिकांना निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसल्यास तात्काळ त्याची माहिती निवडणूक आयोगाला देता येईल. यासाठी cVIGIL हे application आयोगाने तयार केले आहे. त्यावर फोटो काढून ते अपलोड करता येईल. १ तासाच्या आत निवडणूक अधिकारी घटनास्थळी पोहोचतील व त्यानंतर योग्य ती कारवाई करतील असे आयोगाकडून सांगण्यात आले.

मतदानाचा कालावधी एक तासाने वाढवण्यात येणार आहे. तसेच दुसरदर्शन वर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात येणारा वेळही दुप्पट करण्यात आला आहे. यामुळे उमेदवार प्रत्यक्ष प्रचार कमी करतील अशी अपेक्षा आयोगाला आहे.


       
Tags: ElectionElection commissionGoamanipurPunjabuttarpradeshUttrakhand
Previous Post

औरंगाबाद येथे बाबासाहेबांच्या नामफलकावर दगडफेक; अमित भुईगळ यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

Next Post

चंदीगड महानगरपालिकेत भाजप चा महापौर; एक मत बाद ठरवल्याने “आप”चा पराभव.

Next Post
चंदीगड महानगरपालिकेत भाजप चा महापौर; एक मत बाद ठरवल्याने “आप”चा पराभव.

चंदीगड महानगरपालिकेत भाजप चा महापौर; एक मत बाद ठरवल्याने "आप"चा पराभव.

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी
बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते ...

June 21, 2025
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या
बातमी

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

नवी मुंबई : मस्करीची कुस्करी झाली. तुर्भे येथील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आली. ही घटना ...

June 21, 2025
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ...

June 21, 2025
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

June 21, 2025
कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!
बातमी

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

June 20, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क