Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 8, 2022
in बातमी
0
५ राज्यांच्या निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू.
       

Election, Election commission, Goa, manipur, Punjab, uttarpradesh, Uttrakhand

उत्तर प्रदेश, पंजाब, गोआ, मणीपूर आणी उत्तराखंड येथे निवडणुका.

दिल्ली : निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ५ राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. ७ टप्प्यांमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेल अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली. यापैकी उत्तर प्रदेशची निवडणूक ७, मणीपूरची २ आणी पंजाब, गोआ व उत्तराखंड ची निवडणूक १ टप्प्यात पार पडेल.

निवडणुकीच्या तारखा पुढील प्रमाणे :

  • पहिला टप्पा – १०.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश येथे.
  • दुसरा टप्पा – १४.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश, पंजाब, गोआ, व उत्तराखंड येथे.
  • तिसरा टप्पा – २०.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश येथे.
  • चौथा टप्पा – २३.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश येथे.
  • पाचवा टप्पा – २७.०२.२२ रोजी उत्तरप्रदेश व मणीपूर येथे.
  • सहावा टप्पा – ०३.०३.२२ रोजी उत्तरप्रदेश व मणीपूर येथे.
  • सातवा टप्पा – ०७.०३.२२ रोजी उत्तरप्रदेश येथे.

मतमोजणी १०.०३.२०२२ रोजी करण्यात येईल.

१५ जानेवारी पर्यंत प्रचार सभांना बंदी

कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १५ जानेवारीपर्यंत प्रचार सभांना बंदी घालण्यात आली आहे. १५ जानेवरीला बंदी वाढवायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. संपूर्ण प्रचारादरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर, चौकांमध्ये प्रचार सभा, नुक्कड सभा घेता येणार नाही असेही सांगण्यात आले. विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्याची परवानगी मिळणार नाही. निवडून आल्याचे प्रमाणपत्र घ्यायला जातानाही केवळ २ लोकांना सोबत घेऊन जाता येईल.

गुन्हेगारी पर्शवभूमी असल्यास लोकांसमोर जाहीर करणे बंधनकारक.

उमेदवारांची गुन्हेगारी पर्शवभूमी असल्यास ती लोकांसमोर जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे बंधन उमेदवार व राजकीय पक्ष दोघांवरही असणार आहे. प्रचाराच्या कालावधीत किमान ३ वेळा गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती TV व वर्तमानपत्रातून जाहीर करणे उमेदवारावर बंधनकारक असणार आहे. तसेच, राजकीय पक्षांनी त्यांच्या संकेतस्थळांवर(website) मुख्य पेज(home page) वर ही माहिती देणे बंधनकारक असणार आहे. एवढेच नव्हे तर गुन्हेगारी पर्शवभूमी असतानाही त्यांना उमेदवारी का दिली याचं करण, स्पष्टीकरण देणेही राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कारण देताना “निवडून येण्याची क्षमता”(winnability) हे कारण देता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवार, नेत्यांचे समर्थन करताना हे कारण सर्रास वापरले जाते.

एकूण १८.३४ कोटी नोंदणीकृत मतदार.

५ राज्ये मिळून १८.३४ कोटी नोंदणीकृत मतदार असल्याचे सांगण्यात आले. यापैकी ८ कोटी ५५ लाख महिला मतदार असणार आहेत. एकूण ६९० विधानसभा मतदारसंघात २,१५,३६८ मतदान केंद्रांची व्यवस्था असेल. यापैकी १६२० मतदान केंद्र पूर्णपणे महिला संचालित असतील.

पोस्टल वोट ची सुविधा

८० वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, कोविडग्रस्त नागरिक व benchmark disability, अर्थात अपंगत्व असलेल्या नागरिकांना घरून मतदान करता येणार आहे. दोन अधिकारी थेट घरी येऊन मतदान करवून घेतली. अशा नागरिकांची माहिती राजकीय पक्षांना सुद्धा देण्यात येईल, जेणेकरून त्यांचे प्रतिनिधी मतदानावेळी उपस्थित राहू शकतील.

उमेदवारी अर्ज ऑनलाइन

उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याची सोय करण्यात येणार आहे. कोविडचा नव्याने वाढणारा प्रादुर्भाव पाहता, अधिकाधिक उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑनलाइन भरावा अशी अपेक्षा निवडणूक आयोगाकडून व्यक्त करण्यात आली.

निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाखांपर्यंत वाढवली

उत्तरप्रदेश, पंजाब व उत्तराखंड येथील उमेदवारांना ४० लाखांपर्यंत निवडणुकीक खर्च करता येणार आहे. गोआ व मणीपूर येथील उमेदवारांसाठी ही मर्यादा २८ लाख असेल.

IAS, IPS व IRS मधून अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रियेवर ते लक्ष ठेऊन असतील. १ लाख मतदान केंद्रांवर webcasting द्वारे लक्ष ठेवण्यात येईल.

सामान्य नागरिकांना निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसल्यास तात्काळ त्याची माहिती निवडणूक आयोगाला देता येईल. यासाठी cVIGIL हे application आयोगाने तयार केले आहे. त्यावर फोटो काढून ते अपलोड करता येईल. १ तासाच्या आत निवडणूक अधिकारी घटनास्थळी पोहोचतील व त्यानंतर योग्य ती कारवाई करतील असे आयोगाकडून सांगण्यात आले.

मतदानाचा कालावधी एक तासाने वाढवण्यात येणार आहे. तसेच दुसरदर्शन वर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात येणारा वेळही दुप्पट करण्यात आला आहे. यामुळे उमेदवार प्रत्यक्ष प्रचार कमी करतील अशी अपेक्षा आयोगाला आहे.


       
Tags: ElectionElection commissionGoamanipurPunjabuttarpradeshUttrakhand
Previous Post

औरंगाबाद येथे बाबासाहेबांच्या नामफलकावर दगडफेक; अमित भुईगळ यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

Next Post

चंदीगड महानगरपालिकेत भाजप चा महापौर; एक मत बाद ठरवल्याने “आप”चा पराभव.

Next Post
चंदीगड महानगरपालिकेत भाजप चा महापौर; एक मत बाद ठरवल्याने “आप”चा पराभव.

चंदीगड महानगरपालिकेत भाजप चा महापौर; एक मत बाद ठरवल्याने "आप"चा पराभव.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध "खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!"
बातमी

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

by Tanvi Gurav
July 17, 2025
0

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails
UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

July 17, 2025
सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि पत्रकार विष्णू बुरे, सचिन पुटगे व रंजित तायडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत एक वेगळी पद्धत अवलंबली. त्यांनी चेंबरच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने पूजा करून प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करत काल रात्री चेंबरवर झाकण बसवले. या सकारात्मक निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडी व सजग पत्रकारांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार तसेच जागरूक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

July 17, 2025
कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

July 17, 2025
सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

July 17, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home