Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

महिला आरक्षणाच्या निमित्ताने…!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 29, 2022
in राजकीय
0
महिला आरक्षणाच्या निमित्ताने…!
       

राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आरक्षण जाहीर झालं आहे. ह्यात महिला राखीव सोडतीत महिलांच्या जागांचा टक्का वाढताना दिसतोय. महानगरपालिकेचा हा निर्णय महिलांना सत्तेत नेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, महिला जितक्या मतदान प्रक्रियेत सहभागी होताना दिसतात, त्यापेक्षा निवडणुकांत प्रत्यक्षपणे भाग घेण्यात नेहमी मागे दिसतात. म्हणजे आपण जर का लोकसभा, विधानसभा निवडणुक प्रक्रियेत भाग घेतलेल्या स्त्रिया पहिल्या, तर काही मोजक्याच महिला भेटतील. त्यातल्या त्यात सर्वसामान्य घराण्यातून स्वच्छेने आलेल्या महिलांची उमेदवारी काढली तर ती अजूनच कमी दिसून येईल. गतवर्षीच्या विधानसभांच्या जागा पाहिल्या तर ३,२३७ इतके एकूण उमेदवार होते, त्यापैकी २३५ उमेदवार ह्या महिला उमेदवार होत्या. २३५ पैकी २४ उमेदवार ह्या विजयी होऊन विधानसभेत दाखल झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ज्या पद्धतीने पुरुषांबरोबरीचा वाटा मिळाला आहे. तो येणाऱ्या काळात विधानसभा – लोकसभा निवडणुकीत सुद्धा मिळावा ; पण प्रत्यक्ष पाहायला गेलं तर ह्या राजकीय आरक्षणाचासुद्धा चुकीचा वापर इथल्या सर्वच प्रस्थापित पक्षांकडून केला जातो. एखाद्या विभागात एखादा पुरुष निवडणुकीची तयारी करत असताना ती जागा महिला आरक्षित पडली की, तो घरच्या स्त्रीला पुढे करतो. म्हणजे उद्या चालून जर ती स्त्री निवडून आली, तर तिचा राजकीय कारभार हा तिच्या घरचा पुरुषच चालवत असतो. गावपातळीवरच्या राजकारणात असे कित्येक प्रकरण पाहायला मिळतील, जिथे महिला उमेदवार जिंकून सरपंचाच्या खुर्चीवर बसते ;पण पडद्यामागे तिचा नवरा काम करत असतो ती मात्र नामधारी असते. ह्या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य घराण्यातून सक्षम आणि राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून आलेल्या स्त्रिया उपेक्षित राहिल्या जातात. मोर्चे, आंदोलन, पक्ष बांधणी, बूथ बांधणी, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या सर्वसामान्य महिलांचा सहभाग महत्त्वाचा वाटतो, तो सहभाग उमेदवारी देताना आपल्याला दिसत नाही. ह्या उपेक्षित महिलेला तिचं नेतृत्व सिद्ध करायचं असेल, तर तिने राजकीय ध्येय, धोरण आखून ताकदीने रणांगणात उतरलं पाहिजे. ह्या प्रस्थापितांच्या राजकारणात तसेच पुरुषी वर्चस्वाविरोधात महिलांना त्यांचं राजकीय अस्तित्व निर्माण करणे हे अत्यंत संघर्षमय आहे. असं असलं तरीही स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी स्त्रियांनी राजकीय सत्ता हस्तगत करणे हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं झालं आहे, हे तिने पहिलं लक्षात ठेवावं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ही खूणगाठ स्त्रियांनी मनाशी बाळगून या प्रवाहात ताकदीने उतरलं पाहिजे. आज देशाच्या, राज्याच्या किंवा ग्रामपातळीच्या राजकारणाचा जर विचार केला ,तर तिथे महिलांच्या सहभागाचा टक्का हा नगण्य असणारा दिसतो. या सर्वांची कारणे शोधली तर प्रामुख्याने संसाधनांची कमतरता आणि राजकीय उदासीनता ह्या दोन कारणांमुळे आपल्याला महिलांचा समावेश कमी असलेला दिसतो. असं असलं, तरी आपल्याला ही संसाधन निर्माण करण्यासाठी झटावे लागणार आहे. इतर राजकीय प्रस्थापित पक्षांच्या बाबतीत पाहिलं तर तिथे असणाऱ्या महिलांना आधीच एखादी राजकीय पार्श्वभूमी असते. त्यामुळे त्या तिथपर्यंत मजल मारू शकल्या. परंतु, सर्वसामान्य स्त्रियांच्या बाबतीत ह्या गोष्टी फार कमी प्रमाणात दिसून येतात. बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात, ”वंचित बहुजन समाजाने सर्वात आधी सत्ताधारी होण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, तर महिलांनीसुद्धा आपल्याला देखील सत्ताधारी व्हायचं आहे, अशी मानसिकता बाळगून भविष्यात वाटचाल करणं गरजेचं आहे. जर अशी मानसिकता ठेवून आपण ताकदीने या लढ्यात उतरलो तर संसाधनांची निर्मिती तसेच प्रस्थापितांच्या राजकारणाला पूरक राजकारण आपण उभं करू शकतो”.

आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महिलांना त्यांचे राजकीय हक्क देणे, राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा मार्ग या निमित्ताने सुरू झालाय. राजकीय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या महिलांना ही मोठी संधी आहे. आज ह्या आरक्षणाच्या निमित्ताने महिलांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. या संधीच महिला कार्यकर्त्यांनी , पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छा शक्ती बाळगलेल्या सर्वच महिलांनी कोणतही दडपण न बाळगता सोनं करावं. महिलांनी ताकदीने या आरक्षणाचा फायदा घेत खऱ्या अर्थाने या जागा भरून काढल्या पाहिजेत !!!

स्नेहल सोहनी,
( लेखिका वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष आहेत.)


       
Tags: Vanchit Bahujan AaghadiWomen's reservation
Previous Post

शाहू महाराजांनी वंचितांसाठी उघडले शिक्षणाचे महाद्वार !

Next Post

तरुणांनो चळवळ समजून घेतांना…..

Next Post
तरुणांनो चळवळ समजून घेतांना…..

तरुणांनो चळवळ समजून घेतांना.....

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 
बातमी

अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

by mosami kewat
July 31, 2026
0

अकोला: वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यकारिणी निवडणुक गुरुवार, ३० जुलै रोजी पार पडली. अकोला शहरातील अशोक वाटिका येथील मतदान केंद्रावर...

Read moreDetails
सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

July 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश संघटात्मक निवडणूक २०२६ उत्साहात पार

July 30, 2026
औरंगाबाद मनपा सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

औरंगाबाद मनपा प्रभाग सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या करुणा जाधव विजयी

July 30, 2026
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

July 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home