Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

mosami kewat by mosami kewat
April 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश
       

भुवनेश्वर : व्यवस्थेच्या क्लिष्ट नियमांनी आणि बँकिंग यंत्रणेच्या अमानुष वर्तनाने एका गरीब आदिवासी भावाला इतकं हतबल केलं की, त्याने आपल्या मृत बहिणीचा सांगाडाच बँकेत आणून “हा पुरावा आता तरी माझे पैसे द्या” अशी आर्त हाक दिली. ओडिशातील केओंझार जिल्ह्यात घडलेली ही घटना केवळ हृदयद्रावक नाही, तर संवेदनाहीन व्यवस्थेच्या तोंडावरचा चपराक आहे.

केओंझार जिल्ह्यातील पटना ब्लॉकमधील मल्लीपासी येथील ओडिशा ग्रामीण बँकेत जीतू मुंडा नावाचा आदिवासी नागरिक आपल्या मृत बहिणी कालरा यांच्या सांगाड्यासह पोहोचला आणि एकच खळबळ उडाली. कालरा यांच्या खात्यात १९ हजार ३०० रुपये जमा होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. पती आणि एकुलता एक मुलगा आधीच मृत्यूमुखी पडल्याने जीतू हेच त्यांचे एकमेव जिवंत नातेवाईक आहेत.

बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी जीतू काही दिवसांपूर्वी बँकेत गेले होते. मात्र मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारसदाराचा दाखला आणा, असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. अशिक्षित, गरीब आणि कागदपत्रांविना जगणाऱ्या आदिवासी माणसासाठी ही प्रक्रिया अशक्यप्राय होती. पण बँकेच्या यंत्रणेला त्याची वेदना कळली नाही.

अखेर व्यवस्थेच्या दगडी भिंतीवर धडक देण्यासाठी जीतू यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी बहिणीची कबर उकरून अवशेष बाहेर काढले, ते कापडात गुंडाळले आणि तीन किलोमीटर रणरणत्या उन्हात खांद्यावर घेऊन बँकेपर्यंत चालत पोहोचले. “खातेधारकाला घेऊन या” या बँकेच्या निर्ढावलेल्या उत्तराला त्यांनी अक्षरशः सांगाडाच उत्तर म्हणून आणला.

हे दृश्य पाहून बँकेत उपस्थित नागरिक संतप्त झाले. “कागदांपेक्षा माणुसकी मोठी असते,” अशी संतप्त प्रतिक्रिया देत ग्राहकांनी बँक प्रशासनाला धारेवर धरले. गावच्या सरपंचाची शिफारस, स्थानिक पडताळणी किंवा मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेता आला असता, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणात माणुसकीच्या भूमिकेतून हस्तक्षेप करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ही घटना केवळ एका आदिवासी भावाच्या हतबलतेची नाही, तर गरीब, आदिवासी आणि वंचितांना आजही व्यवस्था कशी कागदपत्रांच्या कुंपणात अडकवते, याचं विदारक वास्तव आहे. संविधान समानतेची हमी देतं; पण व्यवहारात माणुसकीच हरवली, तर अशा सांगाड्यांनाच पुरावे बनून फिरावं लागतं हीच या घटनेची सर्वात मोठी शोकांतिका आहे.


       
Tags: MaharashtraOdisha newsPolitical
Previous Post

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

Next Post

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

Next Post
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’
बातमी

विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’

by mosami kewat
July 17, 2026
0

नांदेड : नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय...

Read moreDetails
गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

July 17, 2026
बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

July 16, 2026
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 16, 2026
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home