Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२ % आरक्षण मिळालेच पाहिजे; वंचित बहुजन आघाडीची आंदोलनाची हाक –  रेखाताई ठाकूर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 3, 2022
in बातमी, राजकीय
0
ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२ % आरक्षण मिळालेच पाहिजे; वंचित बहुजन आघाडीची आंदोलनाची हाक –  रेखाताई ठाकूर
0
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आरक्षण  देण्याच्या विषयावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. या निकालानुसार मागासवर्गीयांना आरक्षणाला घातलेली ५० % ची मर्यादा उच्चवर्णीयांसाठी शिथील करण्यात आली आहे. मनुस्मृतीने ज्याप्रमाणे कायद्यासमोर सर्वाना समान वागणूक दिली नाही. उच्चवर्णीयांना सौम्य शिक्षा व शूद्रातिशूद्रांना कडक शिक्षा असे दुहेरी मापदंड लावले तशीच दुटप्पी नीती या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने वापरली आहे.  SC, ST, OBC वगळून उरलेल्या १५ % लोकसंख्येतील फक्त १८ % गरिबांना १० % आरक्षण देऊन सुप्रीम कोर्ट मोकळे झाले हा भयंकर पक्षपात आहे. उच्च उच्चवर्णीयासाठी जर सुप्रीम कोर्टाने घातलेली ५० % ची मर्यादा राहणार नसेल, तर देशातील ५२% ओबिसींच्या आरक्षणाला घातलेली २७ % ची मर्यादा आम्ही मानणार नाही. त्यामुळे ओबिसींना लोकसंख्येच्या प्रमाणात ५२ % आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.

इंद्रा सहानी खटल्यात १३ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेला निर्णय बदलण्याचे काम ५  न्यायमूर्तीच्या घटनापीठाने करणे हा खरेतर घटनात्मक पेचप्रसंग आहे. मागासवर्गीयांच्या आरक्षणाला ५० % ची मर्यादा आणि उच्चवर्णीयांसाठी ही ५० % ची अट शिथील करणे हा सर्व सरळसरळ भेदभाव आहे व मागील दाराने मनुस्मृती आणण्याचे काम केले आहे. उच्चवर्णीय वगळता इतर प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला या आरक्षणाचा लाभ घेण्याला मज्जाव करण्याची भूमिका समान न्यायाच्या मूलभूत संकल्पनेला ठेच लावणारी आहे. या देशातील उच्च नीचतेच्या सामाजिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी संविधानाने केलेल्या उपाय योजनांना खीळ घालण्याचे हे षडयंत्र आहे.

फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्या नेतृत्वातील बहुजन चळवळीने फिरविलेले सामाजिक परिवर्तनाचे चक्र उलटे फिरविण्याचे हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या अधिकारांचे भावी पिढ्यांसाठी रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२% आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे व त्यासाठी आंदोलनाची हाक देत आहे. अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली.


       
Tags: obcrekhathakurreservationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

Next Post

चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा

Next Post
चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा

चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात
बातमी

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात

मुबई - महाराष्ट्रात सुरु असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मार्च पासून निधी न मिळाल्याने चर्चेचा विषय ठरली होती. ...

June 5, 2025
दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील   – नितेश राणे
बातमी

दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील – नितेश राणे

सांगली - मुंबई महापालिका निवडणुुकिच्या पार्शभुमीवर सध्या राज्यात मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या ...

June 5, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित
बातमी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित

पुणे - राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च ...

June 5, 2025
दिवाळी फराळ कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली, राज्यातील कारागृहात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार – राजू शेट्टी
बातमी

दिवाळी फराळ कैद्यांना १२०० रूपये किलोची काजूकतली, राज्यातील कारागृहात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार – राजू शेट्टी

पुणे - दिवाळी फराळाच्या नावाखाली राज्यातील कारागृहात प्रंचड मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ...

June 5, 2025
अकरावी प्रवेशाची ऑनलाईन मुदत आज दुपारी संपली,  ऑफलाईन मुतवाढीची वंचितची मागणी
बातमी

अकरावी प्रवेशाची ऑनलाईन मुदत आज दुपारी संपली, ऑफलाईन मुतवाढीची वंचितची मागणी

पुणे - अकरावी प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी आज दि ५ जून रोजी दुपारी दोन वाजता संपली आहे. काल ४ जून अखेर ...

June 5, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क