Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रशासनातील ओबीसी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात; प्रकाश आंबेडकरांचा इशारा!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 28, 2021
in बातमी
0
NCP आणी RSS, भाजपचे संबंध जगजाहीर!
       

आमचे आरक्षण पूर्ववत करा, त्यानंतरच मतं मागायला या, ही भूमिका ओबीसी समाजाने घ्यावी असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

नागपूर : नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना बाळासाहेब आंबेडकरांनी हा धोक्याचा इशारा दिला. राज्य व केंद्र सरकारच्या संगनमताने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. याचे नोकरी व शैक्षणिक आरक्षणावर सुद्धा परिणाम होतील व तेही धोक्यात आले आहे असा इशारा यापूर्वीच बाळासाहेबांनी दिला होता.

ओबीसी आरक्षणावर निकाल देताना फक्तं एमपीरिकल डेटा हा मुद्दा नसून, कोणाला याची गरज आहे याची निश्चिती करण्याचाही मुद्दा मांडला गेला असल्याचे बाळासाहेबांनी सांगितले. यामुळे जी अवस्था गोवारी, हलबा समाजाची झाली तीच अवस्था ओबीसी समाजातील अधिकाऱ्यांची होऊ शकते असे त्यांनी सांगितले. गोवारी, हलबा अशा काही जाती आदिवासी नाहीत असा निर्णय देण्यात आला होता. यामुळे अनेक वर्षे नोकरीत असलेल्या या जातीतील लोकांना बडतर्फ करण्यात आले. एवढेच नव्हे तर इतकी वर्षे घेतलेला पगारही परत करण्यास सांगितले होते.

नोकरीला लागलेल्या ओबीसींची आता समाजाला जागृत करण्याची जबाबदारी आहे. हे धोके त्यांनी समाजाला समजावून सांगावे व या प्रश्नातून मार्ग काढावा. अन्यथा येत्या एक ते दिड वर्षात जी अवस्था गोवारी, हलबा समाजाची झाली तीच अवस्था नोकरीत असणाऱ्या ओबीसींची होताना दिसते असा इशारा बाळासाहेबांनी दिला.

अमच्यावतीने आम्ही आंदोलन केले. विधानभवनावर धडक मोर्चा नेला. आता हे आंदोलन जिल्हा व तालुका पातळीवर घेऊन जाण्याचे आमचे नियोजन चालले आहे, असे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत आहेत. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी आम्हाला मतं मागायला येऊ नये, असा बोर्ड ओबीसींनी लावावा. मतं मागायची असतील तर आधी आमचं आरक्षण पूर्ववत करा हि भूमिका ओबीसींनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र सरकारने कायदा केला तर अडचण दूर होऊ शकते.

सर्वोच्च न्यायालयाने जो एमपीरिकल डेटा मागितला आहे तो देणे गरजेचे आहे. तो तयार करून आम्हाला द्या. त्यासाठी लागणारा निधी आणी मनुष्यबळ पुरवायला आम्ही तयार आहोत, असा ठराव करून महाराष्ट्र सरकारने तो जनगणना आयोगाकडे पाठवावा. असे केले तर त्यांना तो डेटा तयार करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे एमपीरिकल डेटा ची अडचण दूर होऊन ओबीसी आरक्षण पूर्ववत होऊ शकते असा सल्ला बाळासाहेब आंबेडकरांनी यावेळी दिला.


       
Tags: bjpCongressNCPobcPrakash AmbedkarreservationShivsenaआरक्षणओबीसीकाँग्रेसप्रकाश आंबेडकरभाजपराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

NCP आणी RSS, भाजपचे संबंध जगजाहीर!

Next Post

२५व्या भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन.

Next Post
२५व्या भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन.

२५व्या भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
बातमी

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

by mosami kewat
September 16, 2025
0

मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...

Read moreDetails
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

September 16, 2025
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पुराचा फटका

September 16, 2025
मोदी "द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!" ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

September 16, 2025
बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home