Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 30, 2023
in बातमी
0
नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

सांगली : नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही तर, ठोकशाहीचा पंतप्रधान आहे. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तो एकही पत्रकार परिषद घेणार नाही, त्याला माहीत आहे सभेत आपण फेकू शकतो. पत्रकारांना समोर जाऊन उत्तर द्यायला मोदी घाबरतो. मोदी पत्रकाराला घाबरतो कारण पत्रकार याच्यापेक्षा हुशार आहेत, असा हा भित्रा पंतप्रधान आहे. याची नावालाच फक्त 56 इंच छाती आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगली येथे आज सत्ता संपादन निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेत त्यांनी आरएसएस आणि भाजप यांच्यावर प्रखर टीका केली आहे.

आरएसएस भाजपच्या दहा वर्षातील सत्तेचा हिशोब मांडायची सुरुवात केली पाहिजे. या देशात टोमॅटोचा तुटवडा करून, ३५ हजार कोटींची लूट केली आहे. यावर भाजप – आरएसएसशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. हे लुटारुंचं सरकार आहे, यांना आता मार्गी लावून टाका. पुन्हा यांना सत्तेवर आणण्याची गरज नाही. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पाच वर्षात निवडणुका होतात सरकार बदलतं. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत यायचा कधी प्रयत्न केला नाही पण यावेळी आम्ही सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. असा जाहीर निर्धार ॲड. आंबेडकरांनी या सभेत केला.

मागच्या दहा वर्षात हजारोंच्यावरती आपले सैनिक शहीद झाले आहेत. कारगिलच्या युद्धात सुद्धा एवढे सैनिक शहीद झाले नव्हते. १९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७,६४४ हिंदू कुटुंबे आहेत. २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख आहे, अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर असे म्हणत त्यांनी देशातून परदेशात जाऊन तेथील नागरिकत्व स्वीकारणाऱ्या गंभीर बाबीवर त्यांनी लक्ष वेधले आहे.

या मूर्ख सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाहीये, आमच्या बापजाद्याची इभ्रत वाचवायची आहे, म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ या भाजपने आणलीय. असे त्यांनी सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, संतोष सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.


       
Tags: democracynarendra modiPrakash Ambedkar
Previous Post

उत्तरकाशी मधील मोहिमेचे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले अभिनंदन !

Next Post

वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार – ॲड. प्रियदर्शी तेलंग

Next Post
वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार – ॲड. प्रियदर्शी तेलंग

वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार - ॲड. प्रियदर्शी तेलंग

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!
बातमी

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

by mosami kewat
August 12, 2026
0

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील शेणोडी–मोरघव्हाण रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून रखडल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून या मार्गावरील शालेय बस सेवा पूर्णपणे...

Read moreDetails
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

August 12, 2026
घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

August 12, 2026
युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

August 12, 2026
खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू झाले पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू झाले पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

August 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home