Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 30, 2023
in बातमी
0
नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान – ॲड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

सांगली : नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही तर, ठोकशाहीचा पंतप्रधान आहे. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तो एकही पत्रकार परिषद घेणार नाही, त्याला माहीत आहे सभेत आपण फेकू शकतो. पत्रकारांना समोर जाऊन उत्तर द्यायला मोदी घाबरतो. मोदी पत्रकाराला घाबरतो कारण पत्रकार याच्यापेक्षा हुशार आहेत, असा हा भित्रा पंतप्रधान आहे. याची नावालाच फक्त 56 इंच छाती आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगली येथे आज सत्ता संपादन निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेत त्यांनी आरएसएस आणि भाजप यांच्यावर प्रखर टीका केली आहे.

आरएसएस भाजपच्या दहा वर्षातील सत्तेचा हिशोब मांडायची सुरुवात केली पाहिजे. या देशात टोमॅटोचा तुटवडा करून, ३५ हजार कोटींची लूट केली आहे. यावर भाजप – आरएसएसशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. हे लुटारुंचं सरकार आहे, यांना आता मार्गी लावून टाका. पुन्हा यांना सत्तेवर आणण्याची गरज नाही. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पाच वर्षात निवडणुका होतात सरकार बदलतं. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत यायचा कधी प्रयत्न केला नाही पण यावेळी आम्ही सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. असा जाहीर निर्धार ॲड. आंबेडकरांनी या सभेत केला.

मागच्या दहा वर्षात हजारोंच्यावरती आपले सैनिक शहीद झाले आहेत. कारगिलच्या युद्धात सुद्धा एवढे सैनिक शहीद झाले नव्हते. १९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७,६४४ हिंदू कुटुंबे आहेत. २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख आहे, अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर असे म्हणत त्यांनी देशातून परदेशात जाऊन तेथील नागरिकत्व स्वीकारणाऱ्या गंभीर बाबीवर त्यांनी लक्ष वेधले आहे.

या मूर्ख सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाहीये, आमच्या बापजाद्याची इभ्रत वाचवायची आहे, म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ या भाजपने आणलीय. असे त्यांनी सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, संतोष सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.


       
Tags: democracynarendra modiPrakash Ambedkar
Previous Post

उत्तरकाशी मधील मोहिमेचे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले अभिनंदन !

Next Post

वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार – ॲड. प्रियदर्शी तेलंग

Next Post
वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार – ॲड. प्रियदर्शी तेलंग

वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँग्रेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसमधील निजामी मराठ्यांचा अपप्रचार - ॲड. प्रियदर्शी तेलंग

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

बोधगया, बिहार : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराला भेट दिली. राहुल गांधींच्या महाबोधी मंदिर ...

June 7, 2025
विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?
Uncategorized

विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

पुणे - आकाश शेलार भारत-पाकिस्तान संघर्ष असतो तेव्हा देशभरात गर्जना होते ‘जवाब दो, घुसून मारा’ पण जेव्हा देश खरंच घुसून ...

June 7, 2025
राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू
बातमी

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 114 नवे रुग्ण सापडले असून ...

June 7, 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे
बातमी

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदार व महापालिका अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ईडीने ...

June 7, 2025
रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर
बातमी

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

रायगड - किल्ले रायगडावर काल दि 6 जून रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक मोठ्या ...

June 7, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क