Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नंदुरबारच्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास; पूल रखडल्याने भविष्यावर गदा

mosami kewat by mosami kewat
July 8, 2025
in बातमी
0
नंदुरबारच्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास; पूल रखडल्याने भविष्यावर गदा
       

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग खडतर आणि जीवघेणा बनला आहे.नेसूनदीच्या पाण्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचणे ही त्यांच्यासाठी दररोजची अग्निपरीक्षा ठरत आहे, कारण गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असलेला पूल अजूनही रखडलेला आहे.

या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज नेसूनदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास तर परिस्थिती अधिकच बिकट होते. चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन पालक जीव धोक्यात घालून नदी पार करतात.

अनेकदा पाण्याची पातळी वाढल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच दोन-तीन दिवस मुक्काम करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होते आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.वाघेरे ते करंजाळी दरम्यान पुलाचे काम दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले होते, तरीही ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थ आणि पालकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या पालक आणि गावकऱ्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष असा किती दिवस सुरू राहणार? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


       
Tags: bridgenandurbarschool
Previous Post

Pune – Nashik Expressway: प्रादेशिक विकासाला चालना; प्रवास होणार फक्त 3 तासात

Next Post

आयटी सोडून देशसेवेला निघालेल्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणार्थी दशेत वीरमरण

Next Post
आयटी सोडून देशसेवेला निघालेल्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणार्थी दशेत वीरमरण

आयटी सोडून देशसेवेला निघालेल्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणार्थी दशेत वीरमरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 
article

बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

by mosami kewat
July 16, 2026
0

- तय्यब ज़फ़र जब देश का एक प्रसिद्ध वैज्ञानिक शिक्षाविद और समाज के प्रति समर्पित व्यक्ति सोनम वांगचुक पिछले 19...

Read moreDetails
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 16, 2026
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026
आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

July 16, 2026
जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘लाँग मार्च’: ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home