Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नंदुरबारच्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास; पूल रखडल्याने भविष्यावर गदा

mosami kewat by mosami kewat
July 8, 2025
in बातमी
0
नंदुरबारच्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास; पूल रखडल्याने भविष्यावर गदा
       

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग खडतर आणि जीवघेणा बनला आहे.नेसूनदीच्या पाण्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचणे ही त्यांच्यासाठी दररोजची अग्निपरीक्षा ठरत आहे, कारण गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असलेला पूल अजूनही रखडलेला आहे.

या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज नेसूनदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास तर परिस्थिती अधिकच बिकट होते. चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन पालक जीव धोक्यात घालून नदी पार करतात.

अनेकदा पाण्याची पातळी वाढल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच दोन-तीन दिवस मुक्काम करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होते आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.वाघेरे ते करंजाळी दरम्यान पुलाचे काम दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले होते, तरीही ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थ आणि पालकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या पालक आणि गावकऱ्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष असा किती दिवस सुरू राहणार? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


       
Tags: bridgenandurbarschool
Previous Post

Pune – Nashik Expressway: प्रादेशिक विकासाला चालना; प्रवास होणार फक्त 3 तासात

Next Post

आयटी सोडून देशसेवेला निघालेल्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणार्थी दशेत वीरमरण

Next Post
आयटी सोडून देशसेवेला निघालेल्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणार्थी दशेत वीरमरण

आयटी सोडून देशसेवेला निघालेल्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणार्थी दशेत वीरमरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बातमी

पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

by mosami kewat
February 4, 2026
0

विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन औरंगाबाद: "आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना...

Read moreDetails
चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

February 4, 2026
रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

February 4, 2026
प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

February 4, 2026
‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

February 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home