Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

mosami kewat by mosami kewat
April 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
       

Nagpur : महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहाय्य निधी तातडीने वितरित करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नागपूर जिल्ह्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे 20 हजार गरजू लाभार्थी अर्थसहाय्य निधीपासून वंचित आहेत. निराधार ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच इतर लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून ही मदत दिली जाते. मात्र निधी न मिळाल्याने अनेकांना मूलभूत गरजा भागविणे कठीण झाले आहे.

तसेच लाभार्थ्यांना तहसील कार्यालय व बँकांच्या वारंवार चकरा माराव्या लागत असून, त्यामुळे ते त्रस्त झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गरजू लाभार्थ्यांचा प्रलंबित निधी तातडीने मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने आदी उपस्थित होते.


       
Tags: MaharashtranagpurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन; आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध

Next Post

नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

Next Post
नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?
article

गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?

by mosami kewat
May 19, 2026
0

लेखक - आकाश मनिषा संतराम NEET-UG २०२६ परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरात निर्माण झालेला संताप हा फक्त एका परीक्षेपुरता मर्यादित नाही....

Read moreDetails
बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

May 19, 2026
RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

May 18, 2026
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

May 18, 2026
“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

May 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home