Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जलकुंभी काढण्याचे काम झाल्याचा मनपाचा दावा दिशाभूल करणारा – राजेंद्र पातोडे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 27, 2024
in बातमी
0
जलकुंभी काढण्याचे काम झाल्याचा मनपाचा दावा दिशाभूल करणारा – राजेंद्र पातोडे
       

अकोला : अकोला महानगरपालिका क्षेत्रातील अकोली, सिंधी कॅम्प, निमवाडी, कमला नेहरू नगर, अनिकट, सावतराम चाल, खोलेश्वर, मुख्य गणेश घाट, राम नगर, दगडी पूल, गुलजार पुरा, मासूमशाह कब्रस्तान, रमाबाई नगर, आरपीटीएस रोड ते रेल्वे पुलापर्यंतच्या नदीतील एकूण ४.३ किलोमीटर मोरना नदीपात्रातील जलकुंभी काढण्याचे काम २३ मे रोजी पूर्ण झाले आहे असा दावा मनपा कडून करण्यात आला असला तरी हा दावा खोटा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.

स्थानिक युवकांनी फोटो व्हिडियो वंचित कडे पाठवून ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये अकोली गीता नगर बायपास या परिसरातील जलकुंभी जैसे थे आहे असे दिसत असून पावसाळ्यात तेथील नागरिकांना त्याचा त्रास होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलेल्या जलकुंभी काढण्याची मोहीम ही अकोला शहरातील नागरिकांची फसवणूक करणारी आहे. अकोली गीता नगर बायपास या परिसरातील जलकुंभी कायम असताना २३ मे रोजी मनपा ने कुठले साडे चार किलो मिटर जलकुंभी काढली याचा खुलासा मनपा आयुक्त व जलकुंभी काढण्याची जबाबदारी असलेले अधिकारी कर्मचारी व कंत्राटदार यांनी स्पॉट वर येवून करावा. असे आवाहन देखील पातोडे यांनी केले आहे.


       
Tags: AkolaRajendra PatodeVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही.

Next Post

शाळेमधील युनिफॉर्म आणि साहित्याच्या सक्तीवर कार्यवाही करावी

Next Post
शाळेमधील युनिफॉर्म आणि साहित्याच्या सक्तीवर कार्यवाही करावी

शाळेमधील युनिफॉर्म आणि साहित्याच्या सक्तीवर कार्यवाही करावी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
बातमी

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

by mosami kewat
June 29, 2026
0

मुंबई: एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते,...

Read moreDetails
पुणे जिल्हा हादरला: साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार व हत्याप्रकरणी ६५ वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार व हत्याप्रकरणी ६५ वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

June 29, 2026
भाजपचा 'पेपरफुटी' पॅटर्न

भाजपचा ‘पेपरफुटी’ पॅटर्न

June 29, 2026
दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

June 28, 2026
आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

June 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home