पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे आज पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने वारकऱ्यांसाठी विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला.
वारकऱ्यांना राजगिरा लाडू, केळी, पाण्याच्या बाटल्या, वेफर्स तसेच वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. प्रियदर्शी तेलंग, शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, महासचिव विश्वास गदादे, विकास भेगडे, सतिश साबळे, पितांबर धिवार, नवनीत अहिरे, अजित पानसरे, सतिश रणवरे, शाम गोरे, नागेश भोसले, बी. पी. सावळे सर, अरविंद कांबळे, संदीप चौधरी, दिलीप क्षेत्रे, रवींद्र गायकवाड, कल्याण चौधरी, कोमल शेलार, शिंदे ताई, दादासाहेब गायकवाड, दिपक गायकवाड, राहुल दहिरे, प्रज्योत गायकवाड, योगेश वानखेडे आणि सुमित हतांगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे वारी मार्गावरील हजारो वारकऱ्यांना दिलासा मिळाला.
बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नागपूर : नगर पंचायत बहादुरा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरगुती कचऱ्याचे संकलन दररोज होत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे....
Read moreDetails






