Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Maharashtra Assembly Election : ६ वाजेनंतर टाकलेली ७६ लाख मते? वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात उचलला प्रश्न

mosami kewat by mosami kewat
June 20, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
Maharashtra Assembly Election : ६ वाजेनंतर टाकलेली ७६ लाख मते? वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात उचलला प्रश्न

Maharashtra Assembly Election : ६ वाजेनंतर टाकलेली ७६ लाख मते? वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात उचलला प्रश्न

       

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये केवळ राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली नाही, तर लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता किती महत्त्वाची आहे, हे निवडणुकीतून समोर आले. निवडणुकीत मतदानाचा वेळ संपल्यानंतर, म्हणजे सायंकाळी ६ वाजेनंतर ७६ लाख मते टाकण्यात आली, ज्यामुळे एक असामान्य आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मागणी केली की, या मतदानाचे व्हिडिओग्राफी आणि इतर पुरावे उपलब्ध करून देण्यात यावेत, जेणेकरून जनतेला सत्य कळावे. मात्र, जेव्हा VBA ने माहिती अधिकार (RTI) द्वारे ६ वाजेनंतर झालेल्या मतदानाचा तपशील मागितला, तेव्हा उत्तरात असे सांगण्यात आले की, असा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही. VBA चे प्रतिनिधी चेतन अहिरे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली, जी उच्च न्यायालयाने स्वीकारली, आणि यामुळे देशभरात चर्चेला तोंड फुटले आहे.

याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही सडकून टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत x ( twitter ) हॅण्डलवर ट्विट केले आहे. ते म्हणजे, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन अहिरे यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी ३ फेब्रुवारी रोजी स्वीकारण्यात आली.

तसेच मी चेतन अहिरे यांचे प्रतिनिधित्व करत असून हे प्रकरण न्यायालयात लढत आहे, त्यानंतर भारत निवडणूक आयोगाला नोटीस पाठवण्यात आली होती. पुढे ते म्हणाले, राहुल गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत कोणामध्येही इतकी हिंमत नाही की, ते न्यायालयात जाऊन याची नोंद मागू शकतील.


       
Tags: AssemblyElectionMaharashtravbaforindiavotes
Previous Post

Buldhana : वंचित बहुजन महिला आघाडीचे विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

 Hingoli : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली

Next Post
Hingoli : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

 Hingoli : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
बातमी

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

by mosami kewat
September 16, 2025
0

मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...

Read moreDetails
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

September 16, 2025
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पुराचा फटका

September 16, 2025
मोदी "द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!" ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

September 16, 2025
बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home