नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी न्यायाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने युवक जंतर मंतर येथे जमले असून, ‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांच्या आवाहनानुसार आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी मोर्चाला जंतर मंतरपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील केरळ भवनापर्यंतच परवानगी दिली. यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जंतर मंतर परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवण्यात आली आहे. लाठीचार्ज आणि पोलिस कारवाईनंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी देशभरातून आलेल्या युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून हजारो आंदोलक आंदोलनात सहभागी झाले आहेत. ‘जय भीम’, ‘इंकलाब जिंदाबाद’सह विविध घोषणांनी आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे.
Jai Bhim, Inquilab Zindabad Slogans Echo at Jantar Mantar During NEET Protest






