Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लोकशाही वाचवायची असेल तर एकत्रित येऊन निवडणुका लढवाव्या लागतील – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 5, 2023
in बातमी
0
लोकशाही वाचवायची असेल तर एकत्रित येऊन निवडणुका लढवाव्या लागतील – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई( दि.५ डिसेंबर): संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर, भाजप आणि आरएसएसच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडरकर यांनी केले.

मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की ‘प्रादेशिक पक्षाचा देखील मुख्यमंत्री होऊ शकतो याचं कारण म्हणजे देशातील संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. मात्र आता अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा प्रयत्न चालू आहे.’

संसदीय लोकशाही टिकवणं हे खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्व मिळते. लोकशाही वाचली तर राजकीय पक्ष वाचतात आणि सत्ता अस्तित्वात राहते. अन्यथा सत्ता अस्तित्वात राहत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.

देशात अध्यक्षीय लोकशाही आली तर एकाच समूहाचा राष्ट्रपती किंवा अध्यक्ष होऊ शकतो कारण खालच्या वर्गातील व्यक्तीला मतदान करताना आपला हात थरथरतो आणि वरच्या वर्गातील व्यक्तीला मतदान करताना हात थरथरत नाही.विरोधक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकायची भीती दाखवून सोबत घेत आहेत. या भितीच्या विरोधात जाऊन जे आरएसएस, बिजेपीच्या विरुद्ध लढू शकतात त्यांनी २०२४ च्या निवडणुका एकत्रित लढवल्या पाहिजेत. असे आवाहन त्यांनी इतर पक्षांना केले आहे.

महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत युतीच्या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना( उ. बा. ठा) ही महाविकास आघाडीसोबत आहे. आमच्या आणि शिवसेनेच्या युतीला वर्ष होत आले आहे मात्र, शिवसेनेची महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा होत नसल्याने आमची आणि शिवसेनेची जागावाटपाची चर्चा देखील होत नाही. युतीच्या संदर्भातला निर्णय आता शिवसेनेच्या कोर्टात आहे, निर्णय झाला नाही तर आम्ही ४८ पैकी ४८ जागा लढवण्याची तयारी करणार आहोत. असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.


       
Tags: CongressMaharashtraPrakash AmbedkarShivsenauddhav thakareVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बेरार एज्युकेशन सोसायटीला प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी दिली भेट !

Next Post

वंचित बहुजन आघाडीची राज्य कमिटी बैठक संपन्न !

Next Post
वंचित बहुजन आघाडीची राज्य कमिटी बैठक संपन्न !

वंचित बहुजन आघाडीची राज्य कमिटी बैठक संपन्न !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?
बातमी

लातूरमध्ये NEET परीक्षेच्या मानसिक तणावातून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या; याला जबाबदार कोण?

by mosami kewat
May 26, 2026
0

NEET Paper Leak : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे परिणाम आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही उमटताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव...

Read moreDetails
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत? 

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत? 

May 26, 2026
तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !

तमाशा फडातील सोंगाड्या ते पद्मश्री रघुवीर खेडकर !

May 26, 2026
मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

May 26, 2026
४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

May 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home