Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Ethanol Blended Petrol : इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांचे नुकसान; वंचित बहुजन आघाडीची सरकारकडे भरपाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 17, 2025
in बातमी
0
इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांचे नुकसान; वंचित बहुजन आघाडीची सरकारकडे भरपाईची मागणी

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांचे नुकसान; वंचित बहुजन आघाडीची सरकारकडे भरपाईची मागणी

       

पुणे : भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे (EBP) वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. प्रियदर्शी तेलंग यांनी केला आहे. त्यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडे या धोरणाबाबत श्वेतपत्रिका जाहीर करण्याची आणि वाहनधारकांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी केली आहे.

भारत सरकारने राष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018 (National Policy on Biofuel 2018) लागू केले आहे. या धोरणांतर्गत, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीला E20 (20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) हे लक्ष्य 2030 पर्यंत गाठायचे होते, ज्यामुळे वाहन उद्योगाला वाहनांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता. मात्र, 2022 मध्ये या लक्ष्याची मुदत 2025 पर्यंत कमी करण्यात आली. यामुळे 2023 पूर्वी बनवलेली जुनी वाहने E20 इंधनासाठी योग्य नसल्याने त्यांच्यात बिघाड होत आहे. असे अॅड. प्रियदर्शी तेलंग म्हणाले.

वाहनधारकांना होणारे नुकसान –

अॅड. तेलंग यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, महिंद्रा कंपनीचे अधिकारी सांगत आहेत की, 2023 पुर्वी चे जुनी वाहने 20 साठी अनुकूल नाही. पण, गडकरी हे ऐकूण घ्यायला तयार नाहीत. ऑटोमोबाइल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) नुसार, E20 इंधनामुळे वाहनांच्या कार्बोरेटर, इंधन प्रणाली (injection-fuel system) आणि इंधन गळती (fuel leakage) सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी आवश्यक असलेले ‘corrosion inhibitors’ वापरले जात नसल्यामुळे जुन्या वाहनांचे नुकसान होत आहे.

या धोरणामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचे दर कमी होतील, असे दावे करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात असे कोणतेही सकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत, उलट सामान्य माणसांच्या वाहनांचे नुकसान होत आहे, असे तेलंग यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, त्यांनी पेट्रोलियम मंत्रालय आणि संबंधित मंत्र्यांना पुढील मागण्या केल्या आहेत :

१) पेट्रोल पंपांवर E5 किंवा E10 हे इंधन उपलब्ध करून द्यावे, अन्यथा जे नुकसान होत आहे, त्याची भरपाई करण्यात यावी.

२) एक श्वेतपत्रिका जाहीर करावी की, वार्षिक सुमारे 32,000 कोटी बचत झाली आहे. तर होत ग्राहकांना व सामान्य लोकांना याचा कसा फायदा झाला.

३) इथेनॉल उत्पादनाचा फायदा फक्त साखर कारखानदारांना आहे वा ऊसच्या व्यतिरिक्त मक्या सारखी पिके घेणारे शेतकरी यांना कसा होईल ते श्वेतपत्रिकेत स्पष्ट करावे, अशी मागणी केली आहे.


       
Tags: Biofuel policy IndiaCompensation demandE20 fuel issuesEthanol blended petrolNational Biofuel Policy 2018Petrol consumers losspuneVBA protestvbaforindiaVehicle damage
Previous Post

महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी बुलडाणा येथे जन आक्रोश आंदोलन

Next Post

Mahabodhi Mahavihara Protest : अकोल्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन!

Next Post
अकोल्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन!

Mahabodhi Mahavihara Protest : अकोल्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश आंदोलन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
बातमी

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

by mosami kewat
October 10, 2025
0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...

Read moreDetails
पिंपरी-चिंचवड: धावत्या 'ई-बस'ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

October 10, 2025
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

October 10, 2025
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 10, 2025
फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

October 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home