औरंगाबाद : “स्थानिक समस्यांची खरी जाण वंचितांच्या प्रतिनिधींनाच असते. आजवर प्रस्थापितांनी केवळ विकासाचा निधी लुटण्याचे काम केले आहे. जर सर्वसमावेशक विकास आणि स्थानिक प्रश्न सोडवायचे असतील, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सत्तेत बसवा,” असे आवाहन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. (Sujat Ambedkar zp election)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कचनेर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. औरंगाबाद येथे धडाक्यात ही सभा पार पडली. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की, जर खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास साधायचा असेल आणि पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारखे स्थानिक प्रश्न मार्गी लावायचे असतील, तर सत्तेची चावी वंचित बहुजन आघाडीच्या हाती द्यावी लागेल, असे सुजात आंबेडकर म्हणाले. (Zp election campaign)
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. यावेळी नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

या जाहीर सभेत तय्यब जफर (प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी), सतीश गायकवाड (युवा आघाडी जिल्हाध्यक्ष), अक्षय देहाडे वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






