Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 11, 2025
in बातमी
0
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
0
SHARES
144
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल !

परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? असे विचारत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का? असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयबाई व भाऊ अविनाश सुर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.

ज्यांनी सोमनाथचा खून केला त्या पोलिसांना सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून त्यांना आ.धस यांची साथ असल्याचा आरोपही सोमवारी (दि.10) पत्रकार परिषदेत करण्यात आला. शहरात वंचित बुहजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकर, महिला जिल्हाध्यक्षा सुनिता साळवे यांची उपस्थिती होती.

नाशिक येथे लाँग मार्च आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते पोलिसांना माफ करण्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत. याबाबत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का? असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केला आहे.

तसेच जोपर्यंत सर्व दोषी पोलीस अधिकार्‍यांना शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.आ.धस यांनी मन मोठं करा आणि पोलिसांना माफ करा असे म्हटले असून त्याचा समाचार घेत विजयाबाई सुर्यवंशी म्हणाल्या की, आमचं मन छोटंच आहे, आम्ही गुन्हेगारांना अजिबात माफ करणार नाही. तुमचं चुकीचं बोलणं सहन करणार नाही. माझ्या पोटचं लेकरू गेलंं आहे. माझं लेकरू परत आणून देऊ शकता का? मी कोण्या पोलिसाला माफ करणार नाही, त्यांना मोकळं सोडणार नाही.पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि सोमनाथचे मारेकरी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोदवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील सुर्यवंशी कुटुंबियांनी यावेळी केली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यामुळेच सत्य घटना बाहेर आल्या असून तेच आम्हाला न्याय मिळवून देतील असा विश्वास विजयाबाई सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा संवैधानिक मार्गाने सुरूच राहील असे अविनाश सुर्यवंशी यांनी सांगितले.


       
Tags: parbhaniPrakash AmbedkarSomnath SuryawanshiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भटके विमुक्तांच्या मुलांसाठी सक्तीचे शिक्षण योजना राबविणे गरजेचे : डॉ. नारायण भोसले

Next Post

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

Next Post
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा - रोहिदासीया धर्म

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी
बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते ...

June 21, 2025
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या
बातमी

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

नवी मुंबई : मस्करीची कुस्करी झाली. तुर्भे येथील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आली. ही घटना ...

June 21, 2025
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ...

June 21, 2025
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

June 21, 2025
कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!
बातमी

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

June 20, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क