Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 3, 2025
in बातमी
0
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर

अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. मोदींना टाटा बाय बाय करून देशाला वाचवा असे सांगून ओबीसी समाजाने वेळीच सावध होण्याचा इशारा ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे.

ॲड. आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप-आरएसएसवर हल्ला चढवला. ओबीसींचा घात आरएसएस-भाजपने केला आहे. एवढं तरी ओबीसींनी डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल, असे ते म्हणाले. स्थानिक पातळीवर ओबीसी नेतृत्वाला संधी देणारे आरक्षण आता हातातून जाण्याची शक्यता आहे, असे सांगत ओबीसींसाठी ही धोक्याची घंटा आहे असे सांगून ते म्हणाले, “नुसते राजकीय आरक्षण जाणार नाही, तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाईल. त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावे.”

‘विश्वगुरु’ मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना ॲड. आंबेडकर म्हणाले, स्वतःला विश्वगुरु म्हणणारे देशाच्या संकटात भर घालत आहेत. जगभरात भारतीयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. जगभरातील सुमारे २० कोटी भारतीय देशात परत आल्यास इथल्या व्यवस्थेवर मोठा ताण पडेल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींच्या परदेशातील वागणुकीवर बोट ठेवत ते म्हणाले, स्वतःला विश्वगुरु म्हणणारे नरेंद्र मोदी यांना परदेशात जगातील देश कशा पद्धतीने वागणूक देतो याचे हजारो व्हिडीओ यूट्युबवर आहेत. इतका अपमान नरेंद्र मोदींचा जगभरातील देश करत आहेत.

धम्म मेळाव्यात बोलताना त्यांनी देशाच्या सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले की, भारताचे सैन्य लढायला तयार आहे, पण लढणार कुठून? पाकिस्तानला येणारी युद्ध सामग्री ही जगभरातील देशांकडून येत आहे. पाकिस्तानकडे बाहेरची हत्यारे येत आहेत.

ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्याचे आवाहन केले. ही परिस्थिती बदलायची असेल, तर मोदीला टाटा, बाय बाय करा. त्याचं आणि जगाचं भांडण आहे ते भारतीयाचं नाही, असे ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले, एकही मित्र भारताचा राहिलेला नाही, अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली.

मोदी हे केवळ आपला ‘इगो’ जपण्यासाठी काम करत आहेत. देश महत्वाचा आहे की नाही? हे ठरवा आणि मोदींना टाटा, बाय बाय करून देशाला वाचवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. अकोला पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेळाव्यामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.


       
Tags: AgricultureAkolabjpDhamma Chakra DayFarmerGautam BuddhaMaharashtranarendra modipmPrakash AmbedkarreservationrssSocial JusticeVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Dhamma Chakra Pravartan Din : सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो – अंजलीताई आंबेडकर 

Next Post

धर्मांतर झाले संस्कृतीचे काय?

Next Post
धर्मांतर झाले संस्कृतीचे काय?

धर्मांतर झाले संस्कृतीचे काय?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव
बातमी

पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

by mosami kewat
December 4, 2025
0

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक शहर आहे. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि...

Read moreDetails
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! समाजकल्याण वसतिगृहातील निकृष्ट जेवणावर सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! समाजकल्याण वसतिगृहातील निकृष्ट जेवणावर सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

December 4, 2025
तिवसा : शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी दिवसाच्या वेळीच कृषीपंप वीजपुरवठा सुरू करा - महावितरणला वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा

तिवसा : शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी दिवसाच्या वेळीच कृषीपंप वीजपुरवठा सुरू करा – महावितरणला वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा

December 4, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कामातील विलंबाबाबत वंचित बहुजन आघाडीची तीव्र नाराजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कामातील विलंबाबाबत वंचित बहुजन आघाडीची तीव्र नाराजी

December 4, 2025
संतोष बांगर पुन्हा वादात; मतदान केंद्रात घुसून घोषणाबाजी, गोपनीयतेचा भंग केल्याने कारवाईची मागणी!

संतोष बांगर पुन्हा वादात; मतदान केंद्रात घुसून घोषणाबाजी, गोपनीयतेचा भंग केल्याने कारवाईची मागणी!

December 2, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home