औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज शनिवार (दि. १४) महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन केले.
यावेळी औरंगाबाद येथील प्रसिद्ध देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून शुल्काच्या नावाखाली खंडणी वसूल केली जात असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. या संदर्भात शहराध्यक्ष (पश्चिम) राहुल मकासरे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Deogiri College Students Protest)

विद्यार्थांनायाच्या प्रमुख मागण्या:
१) सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णय असून देखील आपले महाविद्यालय शासन निर्याविरोधात कार्य करताना दिसते जे कर्मचारी है शासन विरोधी कार्य करत असतील किंवा ज्यांच्या आदेशाने हे चालू आहे अशांवर कारवाई करण्यात यावी.
२) मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसूल करण्यात आली आहे. ज्यांच्याकडून पैसे वसूल केले अशा विद्यार्थ्यांना पैसे व्याजासहीत परत करण्यात यावे.
३) जनरल कॅटेगिरीचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांकडून जी फीस डिफरन्स अमाऊंट (फरकतील रक्कम) म्हणून वसूल केली जाते ती ज्या कर्मचाऱ्यांनी वसूल केली आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, व त्यांच्याकडून जेवढी फी विद्यापीठ परीक्षा मंडळाने ठरवून दिली आहे फक्त तीच भरून घ्यावी.
४) मुलींना शिक्षण मोफत आहे याचे परिपत्रक राज्यशासने काढले आहे परंतु, आपल्या महाविद्यालयात मुलींकडून पैसे वसूल केले जात आहेत, हे तत्काळ थांबवावे. ०९ जुलै २०२४ पासून ज्या विद्यार्थिनींचे पैसे वसूल करण्यात आले आहे ते १५ दिवसांच्या आत व्याजासहित परत द्यावे.
५) राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे अपघाती निधन झाले, याचा शोक सर्व देश आणि राज्य करत आहेत. तारखा पुढे ढकलून स्पोर्ट्स, गॅदरींग व इतर कार्यक्रम दर वर्षी प्रमाणे प्रमाणे घेण्यात यावे.
६) विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थाला 2 PRN तयार झाले आहे. त्याने वारंवार आपल्याकडे फेऱ्या मारल्या. परंतु त्याच्या समस्येचे निराकरण करण्याऐवजी आपण त्याला धमक्या देत आहात, त्याची समस्या तत्काळ सोडवण्यात यावी.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची पायमल्ली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राहुल मकसरे यांनी केली आहे. तसेच, वाढीव फीमुळे विद्यार्थ्यांना जो मानसिक आणि आर्थिक त्रास झाला, त्याबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. (Deogiri College Students Protest)

महाविद्यालय प्रशासन जर विद्यार्थ्यांच्या हिताचे शासन निर्णय धाब्यावर बसवून लूट करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास संविधानिक मार्गाने मोठे जनआंदोलन उभे केले जाईल. असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल मकसरे यांनी म्हणाले. यावेळी विद्यार्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन घोषणा दिल्या. यावेळी राहुल मकासरे (शहराध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी), सोनाली चौतमल , कपिल चव्हाण आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.





