Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

आता “स्वाईप” करा आणि आयुष्यभर कर्ज फेडत रहा

mosami kewat by mosami kewat
September 15, 2025
in Uncategorized, अर्थ विषयक
0
आता “स्वाईप” करा आणि आयुष्यभर कर्ज फेडत रहा

आता “स्वाईप” करा आणि आयुष्यभर कर्ज फेडत रहा

       

संजीव चांदोरकर

..ही अवस्था आहे देशातील क्रेडिट कार्ड धारकांची विशेषता तरुण वर्गातील. अनेक सुखवस्तू मध्यमवर्गीय क्रेडिट कार्ड वापरतात ते सोय म्हणून. म्हणजे खिशात कॅश बाळगायला नको आणि साठलेली देणी एकदम क्रेडिट कार्ड बँक/ कंपनीला ठरलेल्या दिवशी देता येतात म्हणून.

पण गेल्या काही वर्षात क्रेडिट कार्ड वापरण्याचे तत्वज्ञान बदलवले गेले आहे. “ आता क्रेडिट कार्ड वापरून मजा करू, खरेदी करू, खर्च करू आणि पैसे मिळतील तसे आणि त्यावेळी परतफेड करू” स्मार्टफोन, गृहपयोगी वस्तू खरेदी, महागडे पर्यटन, विमान प्रवास, लग्न किंवा तत्सम कौटुंबिक समारंभ क्रेडिट कार्ड वापरून झोकात साजरे केले जातात. देशात दहा कोटी पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वाटली गेली आहेत. दर महिन्याला अंदाजे दहा लाख नवी क्रेडिट कार्ड वाटली जातात. त्यापैकी ४० टक्यांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड धारक २० ते ३० वयोगटातील आहेत.

बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या, फिनटेक कंपन्या, को ब्रॅण्डिंग करून…वेड्यासारखी क्रेडिट कार्ड वाटत सुटली आहेत. वित्तीय वर्ष २०२१ मध्ये क्रेडिट कार्ड मार्फत ६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते ते वाढून फक्त चार वर्षात वित्तवर्ष २०२५ मध्ये २५ लाख कोटी रुपयांचे झाले आहेत. आपल्या हातातील उत्पन्न किती, त्या उत्पन्नाची निश्चितता किंवा अनिश्चितता किती याचा विचार न करता क्रेडिट कार्ड वापरली जात आहेत. हे लोण अगदी जिल्हा/ तालुका पातळीपर्यंत पोहोचले आहे.

क्रेडिट कार्ड धारकांपैकी अनेक जण विविध प्रकारच्या अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. जिथे फक्त मासिक आमदनी कमी असते एवढेच नव्हे तर ती अनिश्चित देखील असते. साहजिकच क्रेडिट कार्ड मधील थकित कर्ज वाढत आहेत. वित्तवर्ष २०२० मध्ये थकीत कर्जाचा आकडा ११०० कोटी रुपयांचा होता, तो २०२५ मध्ये ७००० कोटी रुपयांवर गेला आहे. (परतफेडीच्या तारखेपासून ९० दिवसाच्या आत पेमेंट केले नाही तर त्याला थकीत कर्ज म्हटले जाते).

बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या थकीत रकमेवर ४२ टक्के ते ५६ टक्के व्याजदर लावतात. आधीचे पेमेंट केले नसेल आणि तरी देखील नवीन खरेदी केली तर त्या खरेदीवर देखील हे वाढीव व्याजदर लावले जातात. त्यामुळे पेमेंट करायच्या रकमा चक्रवाढ दराने वाढतात. विविध प्रकारच्या जाहिराती, सोशल मीडिया, आणि मुख्य म्हणजे पियर ग्रुपचे प्रेशर यामुळे कुटुंबांचे आणि विशेषतः तरुण वर्गाच्या राहणीमानाच्या / भौतिक आकांक्षा त्यांच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा काही पटीने वाढवल्या गेल्या आहेत. आणि त्या प्रमाणात त्यांच्या हातात उत्पन्नाची पुरेशी साधने मात्र दिली गेलेली नाहीत.

त्यामध्ये आमदनीची अनिश्चितता आहे. उत्पन्नाची साधने शोधणे हा नागरिकांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे काहीसे जनमानसात रुजवले गेले आहे. क्रेडिट कार्ड व्यक्तिगत कर्जाचा एक प्रकार झाला. नाना प्रकारची रिटेल कर्जे पाजली जात आहेत. म्हणून फक्त क्रेडिट कार्डमधून येणाऱ्या कर्जबाजारीपणाची सुटी चर्चा न करता समग्र रिटेल कर्ज क्षेत्र समोर ठेवले पाहिजे कर्जाच्या ओझ्याखाली राहणारा कोणीही प्रौढ कोणत्याच सामाजिक राजकीय इश्यूंवर प्रतिक्रिया देत नाही. मी, माझे आयुष्य, माझा संसार आणि माझे कर्जे, बस्स.

एवढेच त्याचे विश्व राहते. नागरिकांना आणि तरुण वर्गाला, आणि विद्यार्थ्यांना देखील, सतत कर्ज परतफेडीच्या टांगत्या तलवारीखाली आयुष्यभर जगायला लावणे हा फक्त वित्तीय किंवा आर्थिक अजेंडा नाही तर राजकीय अजेंडा देखील आहे. हे समजावून सांगणे म्हणजे राजकीय आर्थिक साक्षरता. हे सत्य नवीन फिन इन्फ्लुएन्सर्स किंवा वित्त साक्षरतेचे क्लासेस कधीही सांगणार नाहीत , त्यांनी सान्गायला सुरुवात केली की त्यांची नोकरी किंवा स्पॉन्सरशिप काढून घेतली जाईल.


       
Tags: Credit card debtEconomicFinancial influencersFinancial literacyFinancial stressloansocial mediaUnsecured loansYouth debt
Previous Post

Washim : वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखा उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

“स्मार्ट सिटी” की “हेल्दी सिटी”?

Next Post
“स्मार्ट सिटी” की “हेल्दी सिटी”?

“स्मार्ट सिटी” की “हेल्दी सिटी”?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान
बातमी

आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान

by mosami kewat
March 23, 2026
0

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश...

Read moreDetails
भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

March 23, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-३

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-३

March 23, 2026
आरएसएस मुख्यालय घेराव ; ॲड. प्रकाश आंबेडकर ने उठाए राफेल और विदेश नीति पर बड़े सवाल

आरएसएस मुख्यालय घेराव ; ॲड. प्रकाश आंबेडकर ने उठाए राफेल और विदेश नीति पर बड़े सवाल

March 23, 2026
नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

March 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home