Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

“स्मार्ट सिटी” की “हेल्दी सिटी”?

mosami kewat by mosami kewat
September 15, 2025
in अर्थ विषयक
0
“स्मार्ट सिटी” की “हेल्दी सिटी”?

“स्मार्ट सिटी” की “हेल्दी सिटी”?

       

संजीव चांदोरकर

सौंदर्यप्रसाधने चोपडलेला चेहरा ही संपूर्ण शरीर आरोग्य संपन्न ? (आरोग्य संपन्न शरीर असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा चेहरा देखील चमकदार असतो) एक काळ असा होता की नैसर्गिक आपत्ती हा शब्द मुख्यत्वे ग्रामीण भागातील मोठ्या नद्या, डोंगर, पर्वत इत्यादीसाठी वापरला जायचा. आता दर पावसाळ्यात तो देशातील शहरे आणि महानगरांसाठी वापरला जात आहे.

सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे होणारे नुकसान, लाखो मानवी तासांचे होणारे नुकसान, पुढचे अनेक महिने आरोग्यावर होणारे परिणाम, आणि स्वतःच्या खिशातून करावे लागणारे खर्च… याचे रुपयातील वस्तुनिष्ठ मूल्य काढण्याची हिम्मत कोणत्याही धोरण कर्त्याला, आणि नागरी नियोजनात मॅथेमॅटिकल मॉडेलिंग करणाऱ्यांकडे नाही हे तर उघड आहे. पण ती लाखो कोटी रुपयात भरेल हे नक्की.

दहा वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या “स्मार्ट सिटी मिशन” मुळे शहरी महानगरी नागरिकांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत नक्की काय फरक पडला ? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधून सौंदर्यकरणाचे , डिजिटलायझेशनचे राबवले गेलेले प्रकल्प पाण्यात वाहून गेले आहेत की तरंगत आहेत ? या सगळ्यावर नक्की किती सार्वजनिक पैसे खर्च झाले ? हे प्रश्न नागरिकांनी विचारायची गरज आहे.

२०४७ सालात भारत नक्की कसा असेल याचे विकास आराखडे तयार होत आहेत. त्यावेळी भारताची शहरी लोकसंख्या जवळपास दुप्पट म्हणजे ९५ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला पावसाचीच नाही तर सर्वच पर्यावरणीय अरिष्टांची तीव्रता आणि वारंवारता वाढतच जाणार आहे हे निरीक्षण मनात येण्यासाठी कोणी पर्यावरणाचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज नाही.

काळजी व्यक्त करणाऱ्या, इशारे देणाऱ्या अशा पोस्ट लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्यांमधील अनेक जण त्यावेळी जिवंत देखील नसतील. पण आपण आपल्या मुलाबाळांची / नातवंड / पत्वंडांची काळजी करतो असा आपण दावा करत असू तर या प्रश्नांना हेड ऑन भिडावेच लागेल.

शहरांमधील महानगरांमधील पायाभूत सुविधा या खरेच इमारतीच्या पायासारख्या असतात. इमारती वर कितीही रंगरंगोटी केली आणि पाया कमकुवत असेल तर काही अर्थ नाही. मुद्दा आपण सत्ताधारी पक्षाचे समर्थक आहोत का विरोधक आहोत हा नाही. कधीच असू शकत नाही. कारण मुळात निसर्ग कानफटात लगावताना हा फरक करतच नाही.


       
Tags: Climate Changecrisisenvironmentalhealthy cityInfrastructure DevelopmentPublic Policysmart city
Previous Post

आता “स्वाईप” करा आणि आयुष्यभर कर्ज फेडत रहा

Next Post

Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे – प्रा. किसन चव्हाण

Next Post
Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे - प्रा. किसन चव्हाण

Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे - प्रा. किसन चव्हाण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home