Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पोलीस भरती मधील अन्यायकारक अटी रद्द करा – वंचित बहूजन युवा आघाडी.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 15, 2022
in बातमी
0
पोलीस भरती मधील अन्यायकारक अटी रद्द करा – वंचित बहूजन युवा आघाडी.
0
SHARES
152
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

अकोला, दि. १५ – अनेक वर्षे कठोर परिश्रम करणाऱ्या आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरूणीची सरकारने फसवणूक केली असून भरतीत उमेदवार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकेल ही जाचक अट टाकत क्रिमीलेयर लावल्याने पोलिस होण्यासाठी मेहनत करणारे उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे. इतर पदांच्या नियुक्ती साठी इव्हेंट साजरा करणा-या राज्य सरकारने तात्काळ ही अट रद्द करण्याची मागणी वंचित बहूजन युवा आघाडीचे वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली असून अटी रद्द न केल्यास युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांचे नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशाराही युवा आघाडीने दिला आहे.

राज्यात पोलिस शिपाईच्या १८ हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वाधिक ७००० जागा मुंबई आयुक्तालयांतर्गत आहेत. यामध्ये एका जिल्ह्यात शहर, ग्रामीण व लोहमार्ग पोलिस अशा गटांत भरती होत आहे. मात्र, कोणत्याही एका गटात एकच अर्ज भरता येण्याची अट यामध्ये घातलेली आहे. २०१९ पर्यंत उमेदवारांना कोणत्याही जिल्ह्यातील भरतीप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी होती. त्यामुळे एका जिल्ह्यात संधी गेली तरी दुसया जिल्ह्यात सहभागी होण्याची शक्यता होती. ज्या जिल्ह्यात जास्त जागा असतील, त्या जिल्ह्यात अर्ज भरता येत होता, परंतु, आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही, असा अर्ज बाद ठरविला जाणार आहे. तसेच क्रिमीलेयरची अट देखील आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो बेेरोजगार अनेक तरुण तरुणी हवालदील आहेत.

एकतर शारीरिक चाचणीत कोणत्याही कारणाने बाद होण्याची शक्यता असते. अशावेळी पुन्हा तयारी करून दुसऱ्या जिल्ह्यासाठी प्रयत्नात यशस्वी होण्याची संधी असते. मात्र, आता ती मिळणार नाही. अशावेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ह्या सर्व उमेदवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत त्वरित शुद्धीपत्रक काढून ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली. मात्र सरकारने त्याची कुठल्याही पद्धतीने दखल घेतलेली नाही.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही भरती सुरू झाली आहे, अश्यावेळी जाचक अटी टाकून आणि बंधने लादून सरकारने बेरोजगार तरुण तरुणीच्या भवितव्याचा खेळ खंडोबा सुरू केला आहे. एकीकडे रोजगार आणि नौकरी देण्याचे नुसते इव्हेंट साजरे करायचे आणि दुसरीकडे अश्या जाटक अटी घालून त्याना संधी नाकारले जाणे हा अन्याय असल्याने वंचित युवा आघाडीने त्वरित शुद्धीपत्रक काढण्याची मागणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल ह्यांना पाठविलेल्या ई मेल द्वारे केली आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101


       
Tags: MaharashtraMaharashtra policeRajendra PatodeVanchit Bahujan Yuva Aaghadiपोलिस भरतीमहाराष्ट्र
Previous Post

भारतातील कामगार कल्याण आणि कामगार कायद्यांमध्ये डॉ. आंबेडकरांचे योगदान !

Next Post

“भारत जोडो” यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी… !

Next Post
“भारत जोडो” यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी… !

"भारत जोडो" यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी... !

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर
Uncategorized

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

पुणे - देशात जातीय जनगणना सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होणार ...

June 6, 2025
अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यात भांडण
राजकीय

अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक एलॉन मस्क यांच्यात भांडण

मुंबई - सध्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योग जगतातील एक मोठ नाव एलॉन मस्क यांच्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून शाब्दीक ...

June 6, 2025
वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात
बातमी

वादानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास पुन्हा सुरूवात

मुबई - महाराष्ट्रात सुरु असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मार्च पासून निधी न मिळाल्याने चर्चेचा विषय ठरली होती. ...

June 5, 2025
दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील   – नितेश राणे
बातमी

दोन बायकांच्या भांडणामुळे ठाकरे बंधु वेगळे, स्वार्थासाठी एकत्र येतील – नितेश राणे

सांगली - मुंबई महापालिका निवडणुुकिच्या पार्शभुमीवर सध्या राज्यात मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या ...

June 5, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित
बातमी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ७ लाख नवमतदार राहणार वंचित

पुणे - राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च ...

June 5, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क