Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात! २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी महाविहार

mosami kewat by mosami kewat
October 3, 2025
in बातमी
0
औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात!

औरंगाबाद : भीमसागराच्या साक्षीने बुद्ध लेणीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात!

       

औरंगाबाद : ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त औरंगाबाद येथील बुद्ध लेणी परिसरात सकाळपासूनच भीमसागर उसळला होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांतील लाखो उपासक-उपासिकांनी तथागत गौतम बुद्ध आणि धम्माची दीक्षा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोभावे स्मरण करत जयजयकार केला.

जनसागर, सेवाभाव आणि अंधारलेली वाट

दरवर्षीप्रमाणेच बुद्ध लेणी परिसर या दिवशी खास नटला होता. परिसरामध्ये शेकडो पुस्तकांची दुकाने थाटण्यात आली होती. अनेक ब्लड बँका रक्तदान करण्यासाठी सज्ज होत्या, तर अन्नदान आणि पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अनेक आंबेडकरी संघटना पुढे सरसावल्या होत्या. मात्र, विद्यापीठातून बुद्ध लेणीकडे जाणाऱ्या मार्गावर अंधार असल्याने उपासक-उपासिकांना मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात ये-जा करावी लागली. विद्यापीठ प्रशासनाने प्रकाशाची सोय करणे आवश्यक होते, तसेच लेणीकडे जाणारा अरुंद आणि डांबरीकरण नसलेला रस्ता देखील उपस्थितांच्या गैरसोयीचा मुद्दा ठरला.

कलाविष्कार आणि २२ प्रतिज्ञा

कार्यक्रमादरम्यान विविध कलाविष्कार सादर करण्यात आले. अभिनेत्री प्रेरणा खरात यांनी सादर केलेले ‘मी रमाई बोलतेय’ हे स्वगत ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यानंतर ज्योत्स्ना कांबळे यांनी प्रेरणाचे स्वागत केले. उपस्थितांनी उभे राहून २२ प्रतिज्ञा ग्रहण केल्या. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनेबाबत कटिबद्धता दर्शवली.

‘भीमयुगाची पहाट’ या संचाचे मुख्य गायक प्रकाशदीप वानखडे, गायिका स्नेहल वानखडे आणि साक्षी वानखडे यांनी आपल्या सादरीकरणाने परिसर भारून टाकला होता. तरुण गायक धम्म धन्वे यांनी ‘सान्या जगात कुठं थी जाय, माझ्या भीमाचा दरारा हाय’ हे गाणे गाऊन धमाल उडवून दिली, तर साक्षी वानखडे हिने ‘लई बळ आलं, माझ्या दुबळ्या पोरात’ हे गीत सादर करून प्रशंसा मिळवली.

२५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी महाविहार

सायंकाळच्या सत्रात अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशुद्धानंद बोधी फाउंडेशनचा भव्य प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प बुद्ध लेणीच्या पायथ्याजवळील २५ एकर जागेत साकारण्यात येणार आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • तथागत गौतम बुद्ध आणि सम्राट अशोकांचे १०० फुटी पुतळे उभारले जातील.
  • विशुद्धानंद बौधी महाविहाराची उभारणी करण्यात येणार आहे.
  • आठ एकरांत बाग-बगीचा विकसित करून या स्थळाला पर्यटन स्थळाचे स्वरूप देण्यात येईल.

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे आवाहन

प्रकल्प पुढील वर्षापर्यंत साकारण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी, यासाठी अॅड. आंबेडकर यांनी आग्रह धरला. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, ‘बुद्ध लेणी बचाव मोर्चा’ नंतर जागेसंबंधीचे विचार आले आहेत. प्रकल्प उभा करायचा असेल तर ही जमीन सरकारने स्वतःहून द्यावी. तसेच, इथे एकवटलेली शक्ती मतपेटीतून दिसली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

आपल्या भाषणात अॅड. आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे देशाचे संविधान लिहिले गेले, असे सांगितले. त्यांनी तरुणांना बुद्धीचा वापर करायला शिकण्याचे, ज्ञान आणि हिंमत मिळवण्याचे आवाहन केले. ज्ञान आणि हिंमत सत्ता देते, हे लक्षात ठेवून सत्तेमुळे समाजात काय पेरायचं हे ठरवता येतं, असे मत त्यांनी मांडले. त्यांनी लोकांना मतदान करताना विकले जाऊ नका, असा मोलाचा सल्लाही दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांतोष वाघमारे, दीपक निकाळजे व बाबा तायडे यांनी केले.


       
Tags: Anjali AmbedkaraurangabadBuddha Dhammabuddhismcelebrationdhamma chakra pravartan din 2025Dr Babasaheb AmbedkarPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

नाशिक: वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली त्रिरश्मी लेणी परिसरात भाविकांना भोजन वाटप

Next Post

विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Next Post
विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

विषारी कफ सिरपचा कहर! मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये १२ बालकांचा बळी, औषध सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
बातमी

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 14, 2025
0

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...

Read moreDetails
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home