Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सत्ता परिवर्तन महासभेला लाखोंच्या संख्येने राहा उपस्थित

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 21, 2024
in राजकीय
0
सत्ता परिवर्तन महासभेला लाखोंच्या संख्येने राहा उपस्थित
       

पुण्यातील पत्रकार परिषदेत मुन्नवर कुरेशींचे आवाहन

पुणे: पुण्यातील सर्व फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या नागरिकांनी आणि आरक्षण वादी विचारांच्या संघटनानी मोठ्या संख्येने सत्ता परिवर्तन महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केले आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग, संतोष संखद, अनिता चव्हाण, प्रफुल्ल गुजर आणि सुनिल धेंडे आदी उपस्थित होते.

आज सर्व नागरिकांसमोर मोठा प्रश्न आहे, देशाच संविधान आणि लोकशाही वाचवायची, यासाठी सत्ता परिवर्तन करणं गरजेचं असल्याचे परखड मत मुन्नवर कुरेशी यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना कुरेशी म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांच आंदोलन चिरडल्या जात आहे. विद्यार्थी आणि युवक यांच्या मुलभूत अधिकारांवर दडपशाही करण्यात येत आहे. विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. तर युवक नोकऱ्यांसाठी वनवन फिरत आहे. तसेच, कोट्यांवधी नोकऱ्या देऊ असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, 2014 मध्ये नोकऱ्यांचा आलेख खाली आला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कुरेशी म्हणाले, जीएसटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. धार्मिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसामार्फत दबाव टाकण्यात येत आहे. राजकीय पक्षांची काय अवस्था झाली आहे. हे वेगळ सांगायला नको. तसेच, गुन्हेगारीने अंतिम सीमा गाठली असून पोलिस स्टेशनमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार होत आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर ही सध्याची सत्ता आपल्या फायद्याची नाही, असं तुम्हाला वाटत असल्यास वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यासाठी एकच पर्याय आणि उत्तर आहे.

कारण, आंबेडकरांची धोरणं, नियोजन सर्व वंचितांच्या बाजूने आहे. समाजातील ज्या वर्गाचा आवाज दाबल्या जात आहे, त्यांचा आवाज बनून त्यांना राजकारणात हिस्सा मिळवून देणे हेच वंचित बहुजन आघाडीचे ध्येय आहे. त्यासाठीच त्यांनी समाजातील तळागाळाच्या लोकांना एकत्र घेऊन, वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या या ध्येयामागे लाखो लोक उभं असून त्याची प्रचिती प्रत्येक सभेत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पुण्यातही सर्व जाती धर्माचे लोक, सर्व संघटना यांनी 27 फ्रेबुवारीला होऊ घातलेल्या सत्ता परिवर्तन महासभेला उपस्थित राहावे, अशी विनंती कुरेशी यांनी केली.


       
Tags: Prakash AmbedkarpuneSatta Parivartan MahasabhaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ मध्ये पक्षप्रवेशाचा धडाका !

Next Post

विद्यार्थ्यांचे परिक्षा फार्म स्विकारण्यास महाविद्यालयाचा नकार !

Next Post
विद्यार्थ्यांचे परिक्षा फार्म स्विकारण्यास महाविद्यालयाचा नकार !

विद्यार्थ्यांचे परिक्षा फार्म स्विकारण्यास महाविद्यालयाचा नकार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई विद्यापीठात भन्तेजींवर हल्ला; खोट्या गुन्ह्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचा संताप
Uncategorized

मुंबई विद्यापीठात भन्तेजींवर हल्ला; खोट्या गुन्ह्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचा संताप

by mosami kewat
September 18, 2025
0

मुंबई : मुंबई विद्यापीठात भंते मीमांसा यांच्यावर सुरक्षा रक्षक बाळासाहेब खरात व त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यामुळे बौद्ध समाजात प्रचंड रोष...

Read moreDetails
Latur : लातूरमध्ये मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने प्रवेश

Latur : लातूरमध्ये मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने प्रवेश

September 18, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी – सम्यक विद्यार्थी आंदोलनाची शासनाकडे मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी – सम्यक विद्यार्थी आंदोलनाची शासनाकडे मागणी

September 18, 2025
सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव  आंबेडकर

सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव आंबेडकर

September 18, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेणार भेट!

आंदोलन मुंबईतील मंत्रालयात नेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही : ॲड. प्रकाश आंबेडकर

September 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home