Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आम्ही केवळ राजकारण नाही, तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय;  उस्मानपुऱ्यात अंजलीताई आंबेडकरांची गर्जना!

mosami kewat by mosami kewat
January 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आम्ही केवळ राजकारण नाही, तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय;  उस्मानपुऱ्यात अंजलीताई आंबेडकरांची गर्जना!
       

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा वेग वाढवला आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. या सभेनंतर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. 

उस्मानपुरा परिसरातील प्रभाग क्रमांक २८ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी या सभेमधून स्थानिक प्रश्नांवरून प्रशासनावर हल्लाबोल केला.

प्रभाग २८ च्या उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन

उस्मानपुरा येथील राहुल नगर, कबीर नगर आणि फुले नगर या भागात ही सभा पार पडली. प्रभाग २८ चे अधिकृत उमेदवार लता निकाळजे, अय्युबखान जब्बार खान पठाण, वर्षा काळे आणि पंकज बनसोडे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी ‘वंचित’च्या नेत्यांचे जंगी स्वागत केले.

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, “महानगरपालिकेत सत्ता भोगणाऱ्यांनी सामान्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले आहे. औरंगाबाद शहराचा स्थानिक विकास आणि नागरी सोयीसुविधांसाठी वंचित बहुजन आघाडी एक सक्षम पर्याय आहे. आम्ही केवळ राजकारण करत नाही, तर स्थानिक समस्यांवर रस्त्यावर उतरून लढत आहोत.”

यावेळी त्यांनी प्रभाग २८ मधील पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर भाष्य करत वंचितच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, प्रस्थापित पक्षांनी गरीब व मध्यमवर्गीय वस्त्यांचा विकास थांबवला आहे. या जाहीर सभेत अरुंधती शिरसाठ यांनीही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मत करण्याचे आवाहन केले.

या जाहीर सभेला उस्मानपुरा परिसरातील नागरिक, महिला, तरुण आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमुळे राहुल नगर आणि कबीर नगर परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. महापालिका निवडणुकीच्या या प्रचार सभेने उस्मानपुऱ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा आता रंगू लागली आहे.


       
Tags: Anjali AmbedkaraurangabadAurangabad municipal corporation electioncorporateCorporationdevelopmentElectionElection commissionElection newsMaharashtrapoliticsUlhasnagarvanchitbahujanaghadi
Previous Post

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अकोल्यात खळबळ : ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

Next Post

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचितला साथ द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

Next Post
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचितला साथ द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचितला साथ द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेला जाब विचारण्याचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका
बातमी

फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेला जाब विचारण्याचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका

by mosami kewat
June 22, 2026
0

मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत...

Read moreDetails
रविदासिया धर्म संघटनेचे सुखदेव महाराज यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली

रविदासिया धर्म संघटनेचे सुखदेव महाराज यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली

June 22, 2026
इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

June 22, 2026
जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

June 22, 2026
FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

June 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home