Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 17, 2024
in राजकीय
0
आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा
0
SHARES
279
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई : ईव्हीएमवर मतदान नको यासाठी सर्व देशभर आंदोलन केली जात आहे. मात्र, याचा निवडणूक आयोगाला किंचितही फरक पडत नाही आहे. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशीनमध्ये कशा पद्धतीने फेरफार होऊ शकते. हे तज्ज्ञ व्यक्तीच्या डेमोद्वारे दाखवून दिले होते. आज काॅंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची समापण महासभा पार पडली. या सभेतही आंबेडकर यांनी ईव्हीएम वर भाष्य केले. तेच मुद्दे राहुल गांधी यांनी देखील मांडले. त्यामुळे आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा दिली असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

फ्युचर गेमिंग कंपनी आहे, या कंपनीचा फायदा 200 कोटी आहे, तर 1300 कोटीचे बाँड या कंपनीने कुठून घेतले असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, मी अशा अनेक कंपन्यांची नावे सांगू शकतो, मग मोदींना या कंपन्यांना सवाल विचारला पाहिजे का नाही. लोकांनी विचारलं पाहिजे. ईडीने या कंपन्यांना विचारलं पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही.

मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाही. हिंदू धर्मामध्ये कुटुंबाबद्दल आपण प्रसार केला पाहिजे. त्यामुळे मोदींनी आपल्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, व्यक्तिगत मुद्दा आहे. पण या चर्चांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवात केली आहे. नॅशनल कल्चरबद्दल तेच बोलले होते, पण आता ते विसरले आहेत. त्यामुळे आता आपणच याचा प्रसार केला पाहिजे,असेही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, सध्या पश्चिम बंगालची वेगळी परिस्थिती आहे. तिकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात २००४ पासून लढत आहे. मी कायदेशीर लढा ही देत आहे. मशीन ही अमेरिकेमधून येत असते. या मशीनमध्ये जी चीप येते. ती 20 ते 25 रुपयांमध्ये मिळते. त्यामुळे यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो.

राहुल गांधी यांना माझी विनंती आहे की, ईव्हीएममध्ये फेरफार शक्य आहे, पेपर ट्रेलिंग आणि वोट यात फरक दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलं पाहिजे. पेपर ट्रेलिंग होऊ शकतं. राहुल गांधी यांनी आवाहन केलं पाहिजे, आम्ही सगळे तुमच्यासोबत एकत्र येऊ, असेही आंबेडकर यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.


       
Tags: CongressPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

‘वंचित’ ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

Next Post
‘वंचित’ ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

'वंचित' ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधातील सभेस वंचित बहुजन आघाडीचा सक्रीय सहभाग; दिशा पिंकी शेख करतील प्रतिनिधित्व
बातमी

तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधातील सभेस वंचित बहुजन आघाडीचा सक्रीय सहभाग; दिशा पिंकी शेख करतील प्रतिनिधित्व

मुंबई - मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीतर्फे आज दिनांक ...

June 29, 2025
दर्यापूर नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
बातमी

दर्यापूर नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात वंचित आक्रमक; संजय चौरपगार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

दर्यापूर - दर्यापूर नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत विकासकामे रखडली असून, नागरिकांना अजूनही योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांत संतापाची ...

June 29, 2025
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण महाराष्ट्र राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणी : पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी
बातमी

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण महाराष्ट्र राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणी : पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी

मुंबई -सूर्यवंशी मृत्यूप्रकरण राज्य मानवाधिकार हक्क आयोगाकडे सुनावणीत जिल्हा दंडाधिकारी, परभणी यांच्यावतीने सरकारी वकिलांनी उपस्थित राहण्याची हमी दिली असून, शपथपत्र ...

June 29, 2025
Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎
बातमी

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎

‎मुंबई: विक्रोळी येथील ६६ कोटी रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी उभारलेला उड्डाणपूल आता वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. यामुळे करत वंचित ...

June 28, 2025
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक
बातमी

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमकजालना : शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर जोपर्यंत नम्रपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना परतुर-मंठा ...

June 28, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क