Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 17, 2024
in राजकीय
0
आंबेडकरांनी दिली राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा
       

मुंबई : ईव्हीएमवर मतदान नको यासाठी सर्व देशभर आंदोलन केली जात आहे. मात्र, याचा निवडणूक आयोगाला किंचितही फरक पडत नाही आहे. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशीनमध्ये कशा पद्धतीने फेरफार होऊ शकते. हे तज्ज्ञ व्यक्तीच्या डेमोद्वारे दाखवून दिले होते. आज काॅंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची समापण महासभा पार पडली. या सभेतही आंबेडकर यांनी ईव्हीएम वर भाष्य केले. तेच मुद्दे राहुल गांधी यांनी देखील मांडले. त्यामुळे आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाला दिशा दिली असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

फ्युचर गेमिंग कंपनी आहे, या कंपनीचा फायदा 200 कोटी आहे, तर 1300 कोटीचे बाँड या कंपनीने कुठून घेतले असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, मी अशा अनेक कंपन्यांची नावे सांगू शकतो, मग मोदींना या कंपन्यांना सवाल विचारला पाहिजे का नाही. लोकांनी विचारलं पाहिजे. ईडीने या कंपन्यांना विचारलं पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही.

मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाही. हिंदू धर्मामध्ये कुटुंबाबद्दल आपण प्रसार केला पाहिजे. त्यामुळे मोदींनी आपल्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, व्यक्तिगत मुद्दा आहे. पण या चर्चांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवात केली आहे. नॅशनल कल्चरबद्दल तेच बोलले होते, पण आता ते विसरले आहेत. त्यामुळे आता आपणच याचा प्रसार केला पाहिजे,असेही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, सध्या पश्चिम बंगालची वेगळी परिस्थिती आहे. तिकडे ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात २००४ पासून लढत आहे. मी कायदेशीर लढा ही देत आहे. मशीन ही अमेरिकेमधून येत असते. या मशीनमध्ये जी चीप येते. ती 20 ते 25 रुपयांमध्ये मिळते. त्यामुळे यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो.

राहुल गांधी यांना माझी विनंती आहे की, ईव्हीएममध्ये फेरफार शक्य आहे, पेपर ट्रेलिंग आणि वोट यात फरक दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलं पाहिजे. पेपर ट्रेलिंग होऊ शकतं. राहुल गांधी यांनी आवाहन केलं पाहिजे, आम्ही सगळे तुमच्यासोबत एकत्र येऊ, असेही आंबेडकर यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.


       
Tags: CongressPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

‘वंचित’ ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

Next Post
‘वंचित’ ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

'वंचित' ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !
article

अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !

by mosami kewat
December 13, 2025
0

- राहुल ससाणेपीएच. डी संशोधक विद्यार्थी व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध आधीछात्रवृत्तीची उलट- सुलट चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून मोठ्या...

Read moreDetails
'GOAT इंडिया टूर'साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

‘GOAT इंडिया टूर’साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

December 13, 2025
सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

December 13, 2025
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!

December 13, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर : बुथवरील चोरी थांबवा; झोपडपट्टीला न्याय द्या!

ॲड. प्रकाश आंबेडकर : बुथवरील चोरी थांबवा; झोपडपट्टीला न्याय द्या!

December 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home