Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

mosami kewat by mosami kewat
August 31, 2025
in बातमी
0
दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

       

नवी दिल्ली : दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात होता होता टळला. टेकऑफ घेतल्यानंतर लगेचच विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे वैमानिकाला समजले. यावेळी प्रसंगावधान राखत त्वरित विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत आणले. यामुळे विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
‎
‎एअर इंडियाच्या AI2913 या विमानाने टेकऑफ केले आणि काही वेळातच वैमानिकाला कॉकपिटमध्ये उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचा इशारा मिळाला. त्यानंतर, वैमानिकाने त्वरित कार्यवाही करत इंजिन बंद केले आणि विमान पुन्हा दिल्लीला सुरक्षितपणे उतरवले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तपास पूर्ण होईपर्यंत हे विमान उड्डाण करणार नाही, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रवाशांसाठी तातडीने दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, ते लवकरच इंदूरला रवाना होतील.
‎
‎वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
‎
‎विमानात आग लागल्याचा इशारा मिळताच प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैमानिकाने अत्यंत शांतपणे आणि कुशलतेने परिस्थिती हाताळली. त्याने योग्य ती खबरदारी घेऊन इंजिन बंद केले आणि विमान पूर्णपणे नियंत्रणात ठेवून दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. वैमानिकाच्या या कामगिरीमुळे प्रवाशांचा जीव वाचला.
‎
‎एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढल्या
‎
‎एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नुकतेच, १८ ऑगस्ट रोजी कोचीहून दिल्लीला जाणारे विमान उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे थांबवावे लागले होते. त्याआधी १६ ऑगस्ट रोजी मिलानहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान ऐनवेळी रद्द करण्यात आले. एअर इंडियाच्या विमानात वारंवार असे बिघाड होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.


       
Tags: Air India flight fireAir India planeAirportfire
Previous Post

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब

Next Post
हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब

हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home