Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘काही चुका होणं स्वाभाविक’ जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

mosami kewat by mosami kewat
August 12, 2025
in बातमी
0
'काही चुका होणं स्वाभाविक' जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

'काही चुका होणं स्वाभाविक' जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

       

‎बिहारमधील विशेष मतदार यादी पडताळणी मोहिमेसंदर्भात राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते मनोज झा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बागची यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.
‎
‎या प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. एका मतदारसंघात १२ जिवंत व्यक्तींना मृत घोषित करण्यात आले आहे आणि अशा अनेक घटना घडल्या आहेत, असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.
‎यावर निवडणूक आयोगाचे वकील राकेश द्विवेदी यांनी अशा प्रक्रियेत त्रुटी असणं स्वाभाविक आहे, असं उत्तर दिलं. द्विवेदी यांनी पुढे सांगितलं की, ही यादी अंतिम नाहीये, त्यामुळे मृत व्यक्तींना जिवंत आणि जिवंत व्यक्तींना मृत घोषित करण्यासारख्या चुका दुरुस्त केल्या जाऊ शकतात.
‎
‎दरम्यान, खंडपीठाने निवडणूक आयोगाला मतदार पडताळणी प्रक्रियेची सुरुवात होण्यापूर्वीची एकूण मतदारांची संख्या, वगळलेल्या मतदारांची संख्या, आणि इतर संबंधित आकडेवारीसह तयार राहण्याचे निर्देश दिले.
‎यापूर्वी, २९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की, जर मोठ्या प्रमाणात पात्र मतदारांची नावे वगळली गेल्याचं आढळल्यास न्यायालय तातडीने हस्तक्षेप करेल.
‎
‎१ ऑगस्ट रोजी बिहारमध्ये ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी जारी केली जाणार आहे. मात्र या प्रक्रियेमुळे कोट्यवधी पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात असा विरोधकांचा आरोप आहे.
‎
‎मनोज झा यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा, काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, भाकपचे डी. राजा, समाजवादी पक्षाचे हरेंद्रसिंह मलिक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अरविंद सावंत, जेएमएमचे सरफराज अहमद आणि भाकप (मार्क्सवादी-लेनिनवादी) चे दीपांकर भट्टाचार्य यांच्यासह अनेक खासदार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या २४ जूनच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
‎
‎


       
Tags: BiharElection commissionsupreme court
Previous Post

डॉक्टरांच्या क्रूरतेने बोकारो हादरले: उपचाराचे पैसे थकवल्याने रुग्णावर कैचीने हल्ला

Next Post

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

Next Post
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन
बातमी

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन

by mosami kewat
March 21, 2026
0

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची...

Read moreDetails
२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

२३ मार्चच्या ‘आरएसएस’ मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

March 21, 2026
गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

March 21, 2026
महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

March 21, 2026
‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा – ॲड. प्रकाश आंबेडकर 

‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा – ॲड. प्रकाश आंबेडकर 

March 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home