रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातामुळे गेली १० तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ एक एलपीजी गॅस टँकर पुलावरून खाली कोसळला, ज्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, खबरदारी म्हणून हातखंबा गावातील वाणी पेठ परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
हा अपघात आज पहाटेच्या सुमारास घडला. एलपीजी टँकर पुलावरून खाली कोसळल्याने त्यातून गॅसची गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गॅस गळती तात्पुरती थांबवण्यात त्यांना यश आले आहे. सध्या पलटी झालेल्या टँकरला सरळ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. टँकर सरळ झाल्यानंतर त्यातील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हलवला जाईल.
वाहतुकीवर परिणाम आणि पर्यायी मार्ग
या अपघातामुळे मुंबई आणि गोव्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने पूर्णपणे अडकून पडली आहेत. छोट्या वाहनांसाठी बावनदी ते पाली असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी अवजड वाहनांना मात्र महामार्गावरच थांबावे लागले आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार, महामार्ग पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून चार ते पाच तास लागण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी अशी घटना असल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नागपूर : नगर पंचायत बहादुरा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरगुती कचऱ्याचे संकलन दररोज होत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे....
Read moreDetails






