औरंगाबाद : दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लिंबे जळगाव येथे बंद पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले. (Ashadhi Ekadashi 2025)
छोटे पंढरपूर येथे दिंडीतील वारकरी जात असताना, त्यांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग,
तसेच नंदकुमार गाडेकर, सईद बाबा पठाण, ज्ञानेश्वर जाधव, काकासाहेब त्रिभुवन, मधुकर त्रिभुवन, कृष्णा गाडेकर, आदित्य गाडेकर, करण गाडेकर, आयुष गाडेकर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (Ashadhi Ekadashi 2025)
पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोर्चा संपन्न! पुणे : महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या...
Read moreDetails






