नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १४६.३९ कोटींवर पोहोचण्याची शक्यता असून, त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे. यामुळे भारत चीनला मागे टाकणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे एकूण प्रजनन दरात घट झाल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate – TFR) आता १.९ इतका झाला आहे. हा दर २.१ च्या प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक पिढीतील लोकसंख्या पूर्वीइतकी पुनरुत्पन्न होत नसून, भविष्यात लोकसंख्यावाढीचा वेग मंदावत जाणार आहे.
या अहवालातील महत्त्वाचे मुद्दानूसार भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये १४६.३९ कोटींवर पोहोचेल. एकूण प्रजनन दर २.१ च्या तुलनेत कमी होऊन १.९ झाला आहे. भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटींपर्यंत पोहोचू शकते, त्यानंतर ती घटण्याची शक्यता आहे.
जनसांख्यिकीय संक्रमणाचा टप्पा ही आकडेवारी सूचित करते की, भारत आता जनसांख्यिकीय संक्रमणाच्या अंतिम टप्प्यात आहे. म्हणजेच, मृत्यूदर आणि जन्मदर दोन्ही घटत असून, लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतो आहे. या परिस्थितीत आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या धोरणांमध्ये बदल घडवणे गरजेचे ठरणार आहे.