Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
       

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १४६.३९ कोटींवर पोहोचण्याची शक्यता असून, त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे. यामुळे भारत चीनला मागे टाकणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे एकूण प्रजनन दरात घट झाल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate – TFR) आता १.९ इतका झाला आहे. हा दर २.१ च्या प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक पिढीतील लोकसंख्या पूर्वीइतकी पुनरुत्पन्न होत नसून, भविष्यात लोकसंख्यावाढीचा वेग मंदावत जाणार आहे.

या अहवालातील महत्त्वाचे मुद्दानूसार भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये १४६.३९ कोटींवर पोहोचेल. एकूण प्रजनन दर २.१ च्या तुलनेत कमी होऊन १.९ झाला आहे. भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटींपर्यंत पोहोचू शकते, त्यानंतर ती घटण्याची शक्यता आहे.

जनसांख्यिकीय संक्रमणाचा टप्पा ही आकडेवारी सूचित करते की, भारत आता जनसांख्यिकीय संक्रमणाच्या अंतिम टप्प्यात आहे. म्हणजेच, मृत्यूदर आणि जन्मदर दोन्ही घटत असून, लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतो आहे. या परिस्थितीत आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या धोरणांमध्ये बदल घडवणे गरजेचे ठरणार आहे.


       
Tags: 2025becomecountryindiamostpopulousUN report
Previous Post

रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले

Next Post

बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद – राहुल द्रविड

Next Post
बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद – राहुल द्रविड

बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद - राहुल द्रविड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home