Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
       

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५ पर्यंत १४६.३९ कोटींवर पोहोचण्याची शक्यता असून, त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे. यामुळे भारत चीनला मागे टाकणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे एकूण प्रजनन दरात घट झाल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate – TFR) आता १.९ इतका झाला आहे. हा दर २.१ च्या प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक पिढीतील लोकसंख्या पूर्वीइतकी पुनरुत्पन्न होत नसून, भविष्यात लोकसंख्यावाढीचा वेग मंदावत जाणार आहे.

या अहवालातील महत्त्वाचे मुद्दानूसार भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये १४६.३९ कोटींवर पोहोचेल. एकूण प्रजनन दर २.१ च्या तुलनेत कमी होऊन १.९ झाला आहे. भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटींपर्यंत पोहोचू शकते, त्यानंतर ती घटण्याची शक्यता आहे.

जनसांख्यिकीय संक्रमणाचा टप्पा ही आकडेवारी सूचित करते की, भारत आता जनसांख्यिकीय संक्रमणाच्या अंतिम टप्प्यात आहे. म्हणजेच, मृत्यूदर आणि जन्मदर दोन्ही घटत असून, लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतो आहे. या परिस्थितीत आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या धोरणांमध्ये बदल घडवणे गरजेचे ठरणार आहे.


       
Tags: 2025becomecountryindiamostpopulousUN report
Previous Post

रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले

Next Post

बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद – राहुल द्रविड

Next Post
बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद – राहुल द्रविड

बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्दैवी आणि दुःखद - राहुल द्रविड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
बातमी

श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

by mosami kewat
June 26, 2026
0

श्रीगोंदा: भटके-विमुक्तांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक 'मुशाफिरी यात्रे'चा भव्य समारोप सोहळा सोमवार, २९ जून २०२६ रोजी...

Read moreDetails
अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

June 26, 2026
पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 26, 2026
हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

June 26, 2026
पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

June 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home