Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

परभणी, बीड, लातूरचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 22, 2025
in राजकीय
0
परभणी, बीड, लातूरचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : प्रशासनात द्वेषाची भावना असणे गंभीर

मुंबई : बीड, परभणी, लातूर येथील घटना सरकारने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. पण जेवढ्या गांभीर्याने या घटना घ्यायला हव्यात तेवढ्या गांभीर्याने सरकार घेताना दिसत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, माऊली सोट यांना नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. फिर्याद दाखल करूनही दोन दिवस पोलिस त्याला बघायलाही आले नाहीत. त्याचे कपडे हॉस्पिटल स्टाफने कुठे ठेवले, कसे ठेवले याबाबत मी जायच्या आधी पोलिसांनी चौकशी केली नाही. माऊली सोट हत्याप्रकरणी डॉक्टरांची साक्ष घ्यायला पाहिजे होती. माऊलीच्या अंगावरील जखमांचे स्वरूप काय आहे. ती सुद्धा साक्ष घेतली गेली नाही.

ज्या पद्धतीने माऊली सोट यांना घरी बोलावून मारण्यात आले आहे. हे एक प्रकारे ऑनर किलिंग आहे. स्व -जातीच्या वर्चस्वाच्या भावनेतून त्याला मारण्यात आले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदार किंवा खासदारांनी त्या कुटुंबाला भेट दिली नाही. तेथील आमदार किंवा खासदारांनी पीडीत कुटुंबियांना भेट देऊन त्यांना मदत करावी, अशी विनंती ॲड. आंबेडकरांनी राजकीय पक्षांना केली आहे.

तसेच, एससी, एसटी अत्याचाराच्या संदर्भातील जो जीआर काढण्यात आला, तो जसाच्या तसा या ऑनर किलिंगच्या घटनेला लागू करावा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच साह्य ऑनर किलिंग प्रकरणात दिले गेले पाहिजे अशीही विनंती ॲड. आंबेडकरांनी शासनाला केली आहे.

गृहमंत्रालय किंवा पोलीस प्रशासन यांच्यात हळूहळू द्वेषाची भावना वाढत आहे असे मला दिसत आहे. हे सगळ्यात वाईट आहे. प्रशासनात जातीचे विष पसरायला लागले आहे. ही चांगली गोष्ट नसल्याची खंत आंबेडकरांनी व्यक्त केली.


       
Tags: #CMOMaharashtrabeedDevendra FadanvislaturMaharashtraparbhaniPrakash AmbedkarSomnath SuryawanshiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवा

Next Post

संविधानाच्या अमृतमहोत्सवी संविधान संवर्धन नाट्य जागर

Next Post
संविधानाच्या अमृतमहोत्सवी संविधान संवर्धन नाट्य जागर

संविधानाच्या अमृतमहोत्सवी संविधान संवर्धन नाट्य जागर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !
article

अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !

by mosami kewat
December 13, 2025
0

- राहुल ससाणेपीएच. डी संशोधक विद्यार्थी व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध आधीछात्रवृत्तीची उलट- सुलट चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून मोठ्या...

Read moreDetails
'GOAT इंडिया टूर'साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

‘GOAT इंडिया टूर’साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

December 13, 2025
सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

December 13, 2025
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!

December 13, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर : बुथवरील चोरी थांबवा; झोपडपट्टीला न्याय द्या!

ॲड. प्रकाश आंबेडकर : बुथवरील चोरी थांबवा; झोपडपट्टीला न्याय द्या!

December 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home