Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 29, 2024
in राजकीय
0
जो पक्ष लोकसभेत किमान 14 जागा ओबीसींना देईल तो आपला पक्ष.
0
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

प्रकाश आंबेडकरांचा ओबीसींना दिला राजकीय मित्रपक्ष ओळखण्याचा सल्ला !

माढा : आपला राजकीय मित्र पक्ष ओळखायचा असेल, तर राखीव जागा सोडून उद्याच्या लोकसभेत ओबीसींना कोण जास्त उमेदवारी देत आहे ते महत्वाचं आहे. जो पक्ष लोकसभा निवडणुकीत ओबीसींना किमान 14 ठिकाणी उमेदवारी देईल तो आपला पक्ष असेल असा मंत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी माढा येथे झालेल्या ओबीसी परिषदेत ओबीसींना दिला आहे.

एक-दोन मंत्री राहून दोन चार खासदार निवडून दिले तर फारसा फरक पडत नाही त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही. जोपर्यंत आपण मोठ्या संख्येने जात नाही तोपर्यंत निर्णय प्रक्रियेवरती आपला ताबा राहत नाही.

भाजप हा बेभरवशाचा पक्ष आहे. भाजपवर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. म्हणून, ज्या पक्षावर विश्वास ठेवता येत नाही. त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही. ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षण निर्णयावर भाष्य करताना ॲड. अबेडकारांनी म्हटले की, भाजप म्हणत होतं की, आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत. आम्ही त्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असे ते म्हणत होते. पण, काल ते काहीच करू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस मात्र गप्प बसले.

संविधान बदलण्याच षडयंत्र भाजप करत आहे. कारण, संविधान केवळ शिक्षणातलं आरक्षण देत नाही, नोकऱ्यांमधील आरक्षण नाही, तर 6.50 कोटी जे महाराष्ट्राचे बजेट आहे त्यातील 27 टक्के हिस्सा ओबीसीला गेला पाहिजे. असेही आपले संविधान सांगते. भाजप करत असलेला धर्माचा कांगावा हा एक प्रकारचा डाव आहे. आरक्षणवादींच्या आरक्षणावरती यांना डल्ला मारायचा असल्याचे मत त्यांनी मांडले.

जो पक्ष आरक्षणवाद्यांना मातीत घालायला निघाला आहे. त्या पक्षाला आपण सत्तेतून दूर करणार आहोत की नाही ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले की, यांना दूर करणार नसाल, तर तुम्ही मातीत जालं. तुमच्या नंतरच्या पिढ्या सुद्धा तुम्ही मातीत घालालं.

आंदोलनातून आणि सभेतून जागृती होते. पण, निर्णय हा विधानसभा आणि लोकसभेमधून घेतला जातो. विधानसभा आणि लोकसभेत आरक्षणवादी पोहचलाच नाही, तर त्यांच्या हिताचं कोण बोलणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.

उद्याच्या निवडणुकीत आपण आरक्षणवादीचं राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही म्हटलं पाहिजे की, माझं मत हे आरक्षणवाद्यालाचं असेल. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.


       
Tags: madhaMaharashtraobcPrakash AmbedkarreservationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ मुंबईमधून लोकसभेच्या 2 जागा लढणार ?

Next Post

खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

Next Post
खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

नागपुरात भाजपची काँग्रेससोबत युती
बातमी

नागपुरात भाजपची काँग्रेससोबत युती

मुंबई - नुकतीच नागपूरात खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली असून यामध्ये चक्क भाजपने आपल्या पांरपरिक विरोधक असलेल्या कॉग्रेससोबत युती केली ...

June 4, 2025
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन
बातमी

शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

मुंबई, दि. ४ जून – दोन दिवसांपूर्वी शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांसोबत अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून संवाद साधला होता. ...

June 4, 2025
हाताने मैला साफ करण्याची पद्धत; राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

हाताने मैला साफ करण्याची पद्धत; राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे – अॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी हाताने गटार साफ करणे, हाताने मलमूत्र उचलणे, साफ करणे, आणि ...

June 4, 2025
‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे
बातमी

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे

२८ दिवसात अधिसूचना काढण्याच्या आदेशानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची अधिसूचना नाही पुणे - वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे यांनी ...

June 3, 2025
अकरावी प्रवेश प्रक्रिया मुदत २० जून पर्यंत वाढवावी, प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात
बातमी

अकरावी प्रवेश प्रक्रिया मुदत २० जून पर्यंत वाढवावी, प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात

अकोला - अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत 20 जून पर्यंत वाढवावी. तसेच विद्यार्थ्यांनाप्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात ...

June 3, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क