Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांच्या गुलामांचा दुटप्पीपणा !

Sumit Wasnik by Sumit Wasnik
July 9, 2022
in राजकीय
0
0
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होऊन एकनाथ शिंदे यांचे आणि भाजप युतीचे सरकार आले आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षा विरोधात बंड करून मविआचे सरकार पाडले ज्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरुन पाय उतार व्हावे लागले. शिवसेनेतील बहुतेक सर्वच प्रमुख नेते या बंडात सामील आहेत, सेनेच्या 55 पैकी 15 आमदाराच ठाकरेंसोबत उरल्यामुळे शिवसेनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

शिवसेनेत उफाळून आलेल्या या बंडाळी नंतरही शिवसेना पुन्हा उभी राहील आणि शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच राहतील असे प्रस्थापित पक्ष असलेल्या काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, पत्रकारांचे, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि आंबेडकरवादाचे पांघरूण घातलेल्या प्रस्थापितांच्या गुलामांचे मत आहे. ही सगळी मंडळी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा उभी राहिल असे ठणकावून समाज माध्यमांवर सांगत आहेत. पण शिवसेनेप्रति सहानुभूती दाखवणारी ही लोक अश्याच प्रकारची परिस्थिती जेंव्हा वंचित समाजातील पक्षांची होते तेंव्हा वंचितांच्या पक्षांची विशेषतः आंबेडकरी पक्षांची मोठ्या प्रमाणावर बदनामी करण्यात अग्रेसर असतात. सेने सारख्या धार्मिक राजकारण करणाऱ्या व सवर्ण नेतृत्व असलेल्या पक्षाला सहानुभूती आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या भारिप-बहुजन महासंघासारख्या पक्षांची बदनामी हा इथल्या प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांच्या गुलामांचा दुटप्पीपणा होय.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनि भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून १९९३ भीमराव केराम यांना आमदार निवडून आणलं होतं. मखराम पवार यांना १९९० मध्ये विधानसभेत आमदार केलं, १९९५ मध्ये विधानपरिषदेवर पाठवून मंत्रीपदी बसविल. त्यानंतर १९९९ साली दशरथ भांडे, रामदास बोडखे आणि वसंत सूर्यवंशी यांना विधानसभेला निवडून आणून आमदार केलं, भांडेंना मंत्री केलं. ही सर्व मंडळी सत्तेच्या आणि पैश्याच्या मोहापायी भारिप-बहुजन महासंघाशी बंडखोरी करून निघून गेली. जेंव्हा हि लोक बंडखोरी करत बाहेर निघाली त्या प्रत्येकवेळी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले, भारिप-बहुजन महासंघाला आता काही भवितव्य नाही अश्या वल्गना करण्यात आल्या. एवढेच नाहीतर जेंव्हा जेंव्हा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंबेडकरी चळवळीने मतपेटीतून आपली ताकद दाखवली तेंव्हा तेंव्हा बाळासाहेबांना भाजपची बी टीम म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचे उदाहरण पाहायचे झाल्यास २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा (४० लाख) आणि विधानसभा (२५ लाख) निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने भरघोस मतदान केले होते, जनतेचे हे प्रचंड समर्थन तोडण्यासाठी ऍड. आंबेडकरांना आणि वंचितला भाजपची बी टीम म्हणण्यात आले. ऍड.आंबेडकरांची बदनामी करणारा हा प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांचा गुलामांचा ‘कुटील आणि कपटी चमू’ आज सेनेत बंडखोरी झाल्यावर उद्धव ठाकरेंबद्दल सहानभूतीची लाट तयार करण्याचे प्रयत्न करतो आहे.
ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदनामीचे हे सत्र न थांबता सुरु आहे. पण त्याने चळवळ थांबली नाही उलट जे सोडून गेलेत त्यांचेच हाल झालेले आपण पाहतो आहोत. भदे , सिरस्कार हे दोन माजी आमदार गेले, ते जिथे गेले तिथे आज त्यांना काहीच किंमत नाही. काही विधानपरिषदेच्या लोभापायी गेले आणि आज ते हास्यास पात्र ठरले आहेत. चळवळीत असलेल्या बहुतेक कार्यकर्त्यांना अश्या विखारी बदनामीमुळे काही फरक पडत नाही ते निरंतर संघटनेसोबत आहेत आणि संघटनेला मजबूत करत आहेत पण म्हणून आपण अफवांचे पीक उगवून वंचितांचे राजकारण संपवू पाहणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
इथल्या जातिव्यवस्थेने नेहमी वंचित आणि बहुजन संघटनांना आणि नेत्यांना संपविण्याचे प्रयत्न केले. कधी शत्रू बनून तर कधी मित्रत्वाचा मुखवटा चढवून बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले. या व्यवस्थेत तळागळाशी असलेला जो वंचित समाज आहे त्याच्या वर येण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला येनकेन प्रकारे दडपण्यासाठी हा ‘कुटील आणि कपटी चमू’ सदैव कार्यरत असतो. पण त्याचवेळी सवर्ण पक्ष आणि त्यांचे नेते अडचणीत येऊ नयेत किंवा अडचणीत आल्यास ते त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास हीच मंडळी अग्रेसर असतात, शिवसेनेत नुकत्याच झालेल्या पक्षफुटीवेळी हे स्पष्टपणे दिसते आहे. वंचित आणि बहुजन जनतेला या ‘कुटील आणि कपटी चमूचा’ हा दुटप्पीपणा ओळखावा लागेल आणि आपले पक्ष, संघटना, नेते टिकवून ठेवावे लागतील तेंव्हाच सत्तेची दारे त्यांच्यासाठी उघडतील.

       
Tags: adv.prakashambedkarvbaऍड. बाळासाहेब आंबेडकरकोरोना. वंचित बहुजन आघाडीगुलामपत्रकारपुरोगामीप्रकाश आंबेडकरप्रस्थापितभारिप बहुजन महासंघमहाराष्ट्रशिवसेना
Previous Post

तरुणांनो चळवळ समजून घेतांना…..

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडी नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक विश्रामगृह अकोला येथे संपन्न.

Next Post
वंचित बहुजन युवा आघाडी नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक विश्रामगृह अकोला येथे  संपन्न.

वंचित बहुजन युवा आघाडी नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक विश्रामगृह अकोला येथे संपन्न.

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे
बातमी

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे

२८ दिवसात अधिसूचना काढण्याच्या आदेशानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची अधिसूचना नाही पुणे - वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे यांनी ...

June 3, 2025
अकरावी प्रवेश प्रक्रिया मुदत २० जून पर्यंत वाढवावी, प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात
बातमी

अकरावी प्रवेश प्रक्रिया मुदत २० जून पर्यंत वाढवावी, प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात

अकोला - अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत 20 जून पर्यंत वाढवावी. तसेच विद्यार्थ्यांनाप्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात ...

June 3, 2025
सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा
बातमी

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा

मुंबई - वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हावतिने "फुले आंबेडकर विचार उत्सव सोहळा -२०२५" आयोजित करण्यात ...

June 3, 2025
शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी
बातमी

शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी

अमरावती - महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी, पारधी, फासेपारधी या समूहाच्या उत्थानासाठी असलेल्या विविध योजना आदिवासी विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येतात. परंतु या ...

June 3, 2025
2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार
बातमी

2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार

अहमदाबाद : आयपीएलच्या 2025 चा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. इतिहासात 9 वर्षानंतर पहिल्यांदाच या सामन्यात रॉयल ...

June 3, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क