Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

एक व्यक्ती, एक मत-एक मूल्य” या संकल्पनेला संविधान समितीचा दुजोरा –  ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
आंबेडकरी राजकारणाचा परिघ विस्तारला !
       

मुंबई – महाराष्ट्र सरकारने आणलेला प्रभाग पद्धतीचा कायदा एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या संवैधानिक संकल्पनेला छेद देणारा असल्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयात त्या विरोधात कायद्याची लढाई लढत आहेत. या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी करण्यात आली. एकंदर कोर्टात झालेल्या चर्चेबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेने आणलेल्या मल्टी मेंबर क्युम्युलेटिव्ह वोटिंग सिस्टम (बहू सदस्य एकत्रीत मतदान प्रणाली) या विषयावर मुंबई उच्च नायालयात चर्चा करण्यात आली. संविधान समितीने अशा वोटिंग सिस्टमवर नकारात्मकता दर्शवली होती. त्या जागी सिंगल मेंबर वॉर्ड (स्वतंत्र प्रतिनिधी प्रभाग) आणि एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य ही संकल्पना समितीने आणली.

तसेच आर्टिकल १४ नुसार कायदा प्रत्येकासाठी सामान आहे. त्यामुळे मुंबईसाठी एक आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी वेगळा न्याय ही पध्दत असंवैधानिक आहे. त्यामुळेच प्रभाग पध्दत रद्द करावी अशी मागणी आम्ही केली आहे. यावर लवकरच न्यायालयात निर्णय घेण्यात येईल. सत्ताधारी पक्ष स्वतःच्या राजकीय स्वार्था साठी प्रभाग रचना आणू पहात आहेत व त्यासाठी संविधानातील मूलभूत लोकशाही तत्त्वांची मोडतोड करत आहेत अशी चर्चा आहे. अलीकडच्या काळात येणाऱ्या महापालिका निवडणूका महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणार असल्याने महापालिका निवडणुकीवर प्रभाव पाडू शकणार्‍या प्रभाग पध्दती बद्दलच्या या न्यायालयीन खटल्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


       
Tags: MaharashtraPrakash Ambedkar
Previous Post

काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी! 

Next Post

धार्मिक उन्माद ! कोणाचा? कशासाठी ?

Next Post
धार्मिक उन्माद ! कोणाचा? कशासाठी ?

धार्मिक उन्माद ! कोणाचा? कशासाठी ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन 
बातमी

शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन 

by mosami kewat
April 28, 2026
0

Osmanabad News : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयात शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाचन करण्यात आले....

Read moreDetails
अहमदनगर पोलीस प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; ११ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन

अहमदनगर पोलीस प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; ११ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन

April 28, 2026
बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न

बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न

April 28, 2026
नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी

April 27, 2026
नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

नागपुरात निराधार योजनेचे 20 हजार लाभार्थी निधीपासून वंचित; वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

April 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home