नवी मुंबई : स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह साईबाबानगर परिसराची पाहणी केली.
यावेळी नागरिकांच्या विविध समस्यांबाबत संबंधित घणसोली वॉर्ड अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून तातडीने समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. तसेच, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या या इशाऱ्याची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. आणि परिसरातील कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी
नागरिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष यापुढेही असाच सुरू राहणार आहे.






